सांगली जिल्ह्यात यंदा साखरेचे उत्पादन घटणार 

Sugar production in Sangli district will decline this year
Sugar production in Sangli district will decline this year

सांगली ः जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, बारा साखर कारखान्यांनी ५८ लाख १२ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७० लाख ८२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. गत वर्षापेक्षा यंदाच्या हंगामात सुमारे २० ते २५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन कमी होईल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रतिवर्षी ऑक्टोबर महिन्यात कारखान्यांचे बॉयलर पेटून गळीत हंगामास प्रारंभ होत असतो. यंदा महापुरामुळे ऊस क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र शेतीचे प्रचंड नुकसान झाले. ऊस क्षेत्रात तर महिनाभर पाणी साचून होते. त्यामुळे ऊसतोड लवकर होऊ शकली नाही. महापूर, अवकाळी पाऊस तसेच दुष्काळामुळे यंदा ऊस क्षेत्र जवळपास ३० टक्केने घटले आहे. त्यामुळे साखर कारखाने उशिरा सुरू झाले. कारखान्यांनी गाळप उशिरा सुरू केले असले तरी फेब्रुवारीनंतर गाळपाला गती आली आहे.

मोहनराव शिंदे साखर कारखान्याने २ लाख २७ हजार मेट्रीक टन उसाचे गाळप करून २ लाख ५० हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे. या कारखान्याचे सर्वात कमी गाळप झाले आहे. सर्वात अधिक राजारामबापू कारखान्याने गाळप केले. तर जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा १२.१८ इतका आहे. महापूर आणि दुष्काळ यामुळे गाळप हंगाम कमी काळ चालून साखरेचे उत्पादन कमी होणार हे निश्‍चित आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com