खानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा तुटवडा

 खानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा तुटवडा
खानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा तुटवडा

जळगाव  : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नोंदविला आहे. उसाचा तुटवडा असल्याने यंदा साखर उत्पादनात घट होणार आहे. उसासाठी कारखान्यांना भटकंती करावी लागत असल्याची स्थिती आहे.  यंदा कारखान्यांना उसाचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक कारखाने मध्य प्रदेशातूनही उसाची खरेदी करीत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील दोन सहकारी व एक खासगी मिळून तीन साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला. या तीन कारखान्यांनी शुक्रवारपर्यंत (ता. १७) चार लाख ३९ हजार ३५६ मेट्रिक टन उसाचे गाळप करीत सरासरी ९.४८ च्या उताऱ्याने ४ लाख १६ हजार ५७७ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. जळगाव जिल्ह्यातील केवळ एका कारखान्याने गाळपात सहभाग नोंदवत १ लाख ९९० मेट्रिक टन उसाचे गाळप करत ९.८२ च्या उताऱ्याने ९९ हजार १४० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. जळगाव जिल्ह्यात सहकारी कारखानदारीला फटका बसला आहे, तर धुळ्यात कुठलाही कारखाना सुरू नसल्याची माहिती मिळाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com