सोलापूर : दुष्काळ, चाऱ्याकरिताचा वापर, ऊस पट्ट्यातील महापुराने यंदाचा ऊस हंगाम एक महिना उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. १५ नोव्हेंबरला हंगाम सुरू होण्याची आणि नव्या सरकारचे मुख्यमंत्रीच याबाबत घोषणा करण्याची माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली आहे.
राज्यात गेल्याच्या वर्षीच्या दुष्काळामुळे पाण्याअभावी खुंटलेली उसाची वाढ, चारा छावण्यांसाठी वापरलेला ऊस आणि या वर्षीचा सांगली, सोलापूर, कोल्हापुरातील पुरामुळे तब्बल अडीच लाख हेक्टरवरील उसाचे नुकसान झाले. यामुळे यंदाचा हंगाम ऑक्टोबरऐवजी १५ नोव्हेंबरला सुरू करण्याचा निर्णय झाला असून, मंत्री समितीकडून औपचारिक घोषणा बाकी असल्याचे साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले.राज्यात मागील साखर हंगामात १९८ कारखान्यांनी सुमारे १२ लाख हेक्टरवरील उसाचे गाळप घेतले. यंदा मात्र दुष्काळ व पुराचा सर्वाधिक फटका उसाला बसला.
या वर्षी गाळपासाठी १६४ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले असून, त्यांना अद्याप परवाना दिलेला नाही. दरम्यान, सीमावर्ती भागातील कारखान्यांनी अन्य राज्यातील उसाची चाचपणी सुरू केल्याचे चित्र आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे हंगाम सुरू करण्याबाबत मंत्री समितीची बैठकही झाली नाही. राज्यातील काही कारखान्यांनी गाळप हंगाम लांबणीवर टाकावा, अशी मागणीही साखर आयुक्तांकडे केली होती. त्यामुळे हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू केला जाईल, असे आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. राज्याची सद्यःस्थिती
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.