कोल्हापुरात ऊस हंगाम थंडच

ऊस तोडणी
ऊस तोडणी

कोल्हापूर  ः ऊस दराचा तोडगा तातडीने निघण्याची शक्‍यता धूसर बनली आहे. कोणत्याही पातळीवरून हालचाली होत नसल्याने कारखानदार कारखाने बंद ठेवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. याबाबत शनिवारी (ता. १०) कारखानदारांची आणखीन एक बैठक होणार आहे. या प्रश्‍नी जिल्ह्यातील कारखानदार लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या भेटी घेणार आहेत. शासनाच्या मदतीशिवाय एफआरपी देणेही मुश्‍कील आहे. त्यामुळे शासन एफआरपीसाठी मदत करत नाही, तोपर्यंत साखर कारखाने सुरू होणार नाहीत, अशी माहिती कारखानदारांच्या सूत्रांनी दिली. याबाबतची दुसरी बैठक शनिवारी (ता. ३) एका हॉटेलमध्ये झाली. त्या वेळी कारखानदार प्रतिनिधी प्रकाश आवाडे यांनी पुढील निर्णयासाठी १० तारखेस आणखीन एक बैठक बोलवणार असल्याचे सांगितले. ‘‘सर्वच शेतकरी संघटनांनी यंदाच्या हंगामात ऊसदराची केलेली मागणी, बॅंकांकडून मिळणारी उचल आणि उत्पादन खर्च यात मोठी तफावत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ६०० रुपयांनी साखरेचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे एफआरपी देणेही अवघड आहे. आम्ही काही शेतकऱ्यांच्या विरोधात नाही. त्यांना ठरलेली एफआरपी द्यावीच लागणार आहे. मात्र ती द्यायची कशी,’’ असा प्रश्‍न असल्याचे श्री. आवाडे यांनी सांगितले.  आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार पी. एन. पाटील, प्रा. संजय मंडलिक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासगी आणि सहकारी साखर कारखानदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा वगळता सर्वत्र साखर कारखाने सुरळीत सुरू आहेत. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनेचा प्रभाव असल्याने इथले कारखाने बंद आहेत. आम्ही संघटनांच्या विरोधात नाही; मात्र आताचे साखरेचे भाव पाहता आम्ही हतबल आहोत. संघटनेने या बाबीचाही विचार करणे आवश्‍यक असल्याचे कारखानदारांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com