नांदेड विभागात ७८ लाख टन ऊस गाळप

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड : प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागांतर्गत असलेल्या परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या ४ जिल्ह्यांतील २३ साखर कारखान्यांचा २०१८-१९ मधील गाळप हंगाम संपला आहे. नांदेड विभागातील साखर कारखान्यांनी एकूण ७८ लाख ६२ हजार ३३३ टन ऊस गाळप केले. सरासरी ११.२३ टक्के उताऱ्याने ८८ लाख २७ हजार २०२ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सर्वाधिक ३५ लाख २२ हजार ६१२ टन ऊस गाळप केले आहे. सरासरी ११.४८ टक्के साखर उताऱ्याने ४० लाख ४२ हजार ५७५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.

नांदेड विभागातील २४ पैकी ११ सहकारी आणि १२ खासगी अशा २३ साखर कारखान्यांनी २७ आॅक्टोबर २०१८ ते ७ एप्रिल २०१९ या कालावधीत ऊस गाळप केले. यंदा परभणी जिल्ह्यातील ५ खासगी साखर कारखान्यांनी २१ लाख ७१७ टन उसाचे गाळप केले आहे. एकूण २२ लाख ७७ हजार ११२ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यात सरासरी १०.८४ टक्के साखर उतारा आला आहे. माखणी (ता. गंगाखेड) येथील गंगाखेड शुगर्स कारखान्याने सर्वाधिक ९ लाख १ हजार ११९ टन ऊस गाळप केले असून १०.२६ टक्के साखर उताऱ्याने एकूण ९ लाख २४ हजार ७२५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. कानडखेड (ता. पूर्णा) येथील बळिराजा शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक सरासरी १२ टक्के आला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील ४ सहकारी आणि १ खाजगी अशा ५ साखर कारखान्यांनी मिळून एकूण ११ लाख १ हजार ११३ टन उसाचे गाळप केले आहे. एकूण १२ लाख ७ हजार २७० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी ११.३८ टक्के साखर उतारा आला आहे. पूर्णा सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक ४ लाख ५९ हजार ६५७ टन ऊस गाळप केले आहे. एकूण ४ लाख ९६ हजार ७०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. डोंगरकडा येथील भाऊराव चव्हाण युनिट २ या साखर कारखान्याचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक ११.७८ टक्के आला आहे.

नांदेड जिल्ह्यातील ३ सहकारी आणि २ खासगी अशा एकूण ५ साखर कारखान्यांनी मिळून एकूण ११ लाख ३७ हजार ८९० टन ऊस गाळप केला आहे. एकूण १२ लाख ५५ हजार ५९५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सरासरी १०.०३ टक्के साखर उतारा आला आहे. भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने सर्वाधिक ३ लाख ८२ हजार ७११ टन ऊस गाळप केले असून ४ लाख ३१ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट ४ चा साखर उतारा सर्वाधिक ११.६२ टक्के आला आहे.

लातूर जिल्ह्यातील ४ सहकारी आणि ४ खासगी अशा एकूण ८ साखर कारखान्यांनी एकूण ३५ लाख २२ हजार ६१२ टन उसाचे गाळप केले आहे. एकूण ४० लाख ४२ हजार ५७५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी ११.४८ टक्के साखर उतारा आला आहे. मांजरा साखर कारखान्याने सर्वाधिक ७ लाख ३ हजार ५४१ टन ऊस गाळप केले असून ८ लाख ४३ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. रेणा साखर कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक १२.२२ टक्के आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com