जळगाव ः खानदेशात गेल्या १२ दिवसांपासून ढगाळ व पावसाळी वातावरण आहे. अशातच गुरुवारी (ता. १८) मध्यरात्रीनंतर सर्वत्र पाऊस झाला. यामुळे ऊसगाळपही रखडले आहे.
खानदेशात नंदुरबारात तीन, जळगाव जिल्ह्यात दोन साखर कारखाने सुरू झाले आहेत. यंदा गाळप वाढणार आहे. समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील कारखान्याने १२ लाख टन ऊसगाळपाच्या दिशेने कामही सुरू केले आहे. परंतु पावसाळी वातावरणामुळे गाळप थांबले आहे. ऊसतोडणीवरही परिणाम झाला आहे. शनिवारी (ता.२०) काही भागांत ऊसतोडणी सुरू झाली. परंतु वाहतूक बंदच होती. कारण गाळपावर परिणाम झाला आहे.
गाळपाला गेल्या १० दिवसांपूर्वी चांगला वेग आला होता. जळगाव जिल्ह्यात चोपडा, चाळीसगाव, मुक्ताईनगर आदी भागांत ऊसतोडणी सुरू होती. तसेच धुळ्यात शिरपूर, नंदुरबारात तळोदा, शहादा, नवापूर या भागांतही ऊसतोडणीला वेग आला होता.
नंदुरबारातील कारखाने मध्य प्रदेशातूनही उसाची खरेदी करीत होते. तर जळगाव जिल्ह्यात औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यांतील ऊस खरेदीदार देखील दाखल झाले होते. परंतु पावसाळी वातावरणामुळे ऊसतोडणी रखडली आहे. पुढील काही दिवसदेखील ही कार्यवाही रखडत सुरू राहील.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.