कोकणातील भातशेतीच्या नुकसानीपोटी हेक्टरी ५० हजार द्या : सुनिल तटकरे

सुनिल तटकरे
सुनिल तटकरे

रत्नागिरी  ः पावसामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भातशेतीकरिता भरपाईपोटी हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत, यासाठी शासन दरबारी लढा देऊ, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी दिला. तसेच सांगली, कोल्हापूरमधील पूरस्थितीला सामोरे जाताना सरकारने संवेदना ठेवून काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, की पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी सरकार इतर गोष्टींवर अधिक भर देत आहे. जनजीवन सुरळीत करण्यासाठी लोकांना मोकळ्या वातावरणात ठेवण्याची गरज आहे; मात्र मंत्र्यांविरोधात वातावरण होत असल्याचे कारण देत जमावबंदी करत आहे. हे लोकशाहीला घातक असून सरकारने ही गोष्ट गांभिर्याने घेतली पाहिजे. २००५ मध्ये निर्माण झालेल्या स्थितीला काँग्रेस आघाडीचे सरकार चांगल्या पध्दतीने सामोरे गेले होते. तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा अनुभव सरकारने विचारात घ्यावा. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला सहकार्य करण्यास तयार आहे. शासनाकडून तत्काळ मदत वाटप होणे गरजेचे आहे.

पश्‍चिम महाराष्ट्राबरोबरच कोकणातील जिल्ह्यांनाही पुराचा फटका बसला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातशेती पुराच्या पाण्यात राहिल्यामुळे भातपीक कुजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळणे गरजेचे आहे. येथील भौगोलिक स्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई मिळावी, यासाठी आम्ही शासनदरबारी प्रयत्न करणार आहोत. शासनाने जाहीर माणशी पाच हजार रुपये मदत प्रत्येकाला द्यायला हवी होते. हा प्रस्ताव घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com