राष्ट्रवादी करणार हल्लाबोल आंदोलन : सुनील तटकरे

सुनिल तटकरे
सुनिल तटकरे

मुंबई: रखडलेली शेतकरी कर्जमाफी, बेरोजगारी, नागरी भागातील प्रश्न सोडवण्यास आलेले अपयश, राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था आदी मुद्दे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस येत्या २५ नोव्हेंबरपासून राज्यभर हल्लाबोल आंदोलन करणार अाहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी (ता. १४) दिली. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. तटकरे पुढे म्हणाले, की राज्य सरकारने २५ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यात कमालीची दिरंगाई होत आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. त्यासोबतच बेरोजगारी, नागरी भागातील प्रश्न सोडवण्यास सरकारला अपयशच आले आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. नागपुरात एकेका दिवसात ६ ते ७ हत्या होत आहेत. गृहखाते कुणाकडेही ठेवा पण आधी कायदा सुव्यवस्था तरी सांभाळा. मंत्रालयात आंदोलन करणारा तो तरुण स्वतःवरील अन्यायाविरोधात पेटून उठला होता, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.  येत्या २५ नोव्हेंबरपासून राज्यभर हल्लाबोल आंदोलन करणार आहोत. त्याची सुरवात कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकापासून केली जाणार आहे. तसेच १ डिसेंबरपासून यवतमाळ ते नागपूर अशी पदयात्रा काढणार आहोत. ११ डिसेंबर रोजी ही पदयात्रा हिवाळी अधिवेशनावर धडकवून सरकारला जाब विचारणार आहोत, असेही ते म्हणाले. प्रतिक्रिया राज्यातील १२ कोटी लोकांपैकी ५०० जणांना लाभ मिळाला, त्याची कसली जाहिरात करता? शेतकऱ्यांना अजून कर्जमाफीचे पैसे मिळाले नाहीत. यापुढे सरकारच्या कोणत्याही कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते जाणार नाहीत. - अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com