बेरोजगारी, शेतीप्रश्नांवर सरकार असंवेदनशील : सुप्रिया सुळे

सध्या पक्ष बदलणे हे मोबाईलमधील सिम कार्ड बदलण्यासारखे झाले आहे. थोडे कोणी जास्त दिले की तिकडे जातात. पॅकेजिंग बदलले म्हणून आतला माल बदलणार आहे का? जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी कोण कुठल्या पक्षात जातोय, यावरच चर्चा होत आहे. - सुप्रिया सुळे, खासदार.
खासदार सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे

नाशिक  : देशात आर्थिक मंदीचे सावट आहे. बेरोजगारीसह शेतीचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. नाशिकमधील कंपन्यांमध्येही कामगार कपात होत आहे. राज्यातील गंभीर प्रश्नांवर चर्चा होत नाही. हे सरकार याप्रश्नांबाबत असंवेदनशील आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केली. 

नाशिक येथील राष्ट्रवादी भवन येथे मंगळवारी (ता. २७) आयोजित पत्रकार परिषदेत खासदार सुळे बोलत होत्या. या वेळी माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, आमदार दीपिका चव्हाण, नरहरी झिरवाळ, माजी आमदार दिलीप बनकर, उत्तम भालेराव, श्रीराम शेटे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, निवृत्ती अरिंगळे, रत्नाकर चुंभळे, समीना मेमन, सचिन पिंगळे आदी उपस्थित होते. 

या वेळी खासदार सुळे म्हणाल्या, की राज्यात नोकऱ्या असतील तर बेरोजगारांची संख्या का वाढत आहे? बेरोजगारीसारखे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारने धोरण आखण्याची गरज आहे. राज्यात एवढी बिकट स्थिती असताना मुख्यमंत्री केंद्रात समस्या का मांडत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शासनाच्या विरोधात बोलणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात असल्याची चर्चा आहे. सध्या तर राजकारणाची व्याख्याच बदलली आहे. त्याला सर्वच जबाबदार आहे, असे त्यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com