साताऱ्यात ‘स्वाभिमानी’चा रास्ता रोको

केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयक महाराष्ट्रात लागू करू नये, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरूवारी (ता. ५) सातारा-कोरेगाव रस्त्यावर बॉम्बे रेस्टॉरंट चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
swabhimani agitation in satara
swabhimani agitation in satara

सातारा : केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयक महाराष्ट्रात लागू करू नये, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरूवारी (ता. ५) सातारा-कोरेगाव रस्त्यावर बॉम्बे रेस्टॉरंट चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, दादासाहेब यादव, रमेश पिसाळ, संजय जाधव, ॲड. विजय चव्हाण, ॲड. सतीश कदम, राजू घाडगे व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

श्री. शेळके म्हणाले की, शेतकऱ्यांना अस्थिर करणाऱ्या केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यांत मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातील २५० हून अधिक शेतकरी संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहेत.

महाराष्ट्रातही हे विधेयक लागू करू नये, यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालास चांगली किंमत मिळावी आणि त्यांच्या मालाला लवकरात लवकर ग्राहक मिळण्याची आवश्‍यकता आहे. तसेच एपीएमसी बाहेर विक्री झाल्यास बाजार शुल्क न मिळाल्याने राज्याचे नुकसान होणार आहे. किमान आधारभूत किमतीची यंत्रणा मोडकळीस येणार आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे नसून पूर्णपणे तोट्याचे आहे. त्यामुळे विधेयकाला विरोध करण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला असून, केंद्र सरकारने तत्काळ विधेयक मागे न घेतल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com