बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (कनेक्शन कट) कारवाई करण्याचा इशारा महावितरणने राज्
ताज्या घडामोडी
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर जागर आंदोलन
कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना येथील शेतकऱ्यांनी आठवडाभरापासून दिल्ली येथे आंदोलन सुरू केले आहे, तरीही केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता. ३) रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर भजन, कीर्तन करत जागर आंदोलन केले.
सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना येथील शेतकऱ्यांनी आठवडाभरापासून दिल्ली येथे आंदोलन सुरू केले आहे, तरीही केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता. ३) रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर भजन, कीर्तन करत जागर आंदोलन केले.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, संजय जाधव, जनार्दन आवारे, हणमंत जाधव, संदीप पाटील, मनोज जाधव, सुनील जाधव, माणिक चव्हाण, महादेव डोंगरे, हिंदूराव शेळके, दादा फडतरे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. शेळके म्हणाले, की केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मंजूर केले आहेत. हे कायदे शेतकरी विरोधी असल्याने पंजाब, हरियाना व इतर काही राज्यांतील शेतकरी केंद्र सरकार विरोधात रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या सुरू केला आहे.
या आंदोलक शेतकऱ्यांसोबत महाराष्ट्रातील शेतकरी असल्याने केंद्र सरकारच्या विरोधात स्वाभिमानी संघटनेच्या वतीने राज्यभर जागर आंदोलन करण्यात आले. पुढील दोन दिवसांत केंद्र सरकारने निर्णय घेतला नाही, तर राज्यातही टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला.
- 1 of 1025
- ››