नंदुरबार बाजार समितीविरोधात ‘स्वाभिमानी’ची पणन मंत्र्यांकडे तक्रार 
नंदुरबार बाजार समितीविरोधात ‘स्वाभिमानी’ची पणन मंत्र्यांकडे तक्रार 

नंदुरबार बाजार समितीविरोधात ‘स्वाभिमानी’ची पणन मंत्र्यांकडे तक्रार 

नाशिक : नंदुरबार जिल्ह्यातील पळाशी व शहादा येथे सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदी केंद्र सुरू आहे. मात्र, कापूस खरेदीत बाजार समितीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांविरुद्धच कामकाज करीत असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला असून याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

नाशिक : नंदुरबार जिल्ह्यातील पळाशी व शहादा येथे सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदी केंद्र सुरू आहे. मात्र, कापूस खरेदीत बाजार समितीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांविरुद्धच कामकाज करीत असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला असून याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. 

सीसीआय कापूस खरेदी पळाशी व शहादा येथे जिनिंगवर सुरू आहे. याकामी शेतकरी व कापूस विक्री केंद्र यांच्यात समन्वय साधण्यासाठी नंदुरबार बाजार समितीकडे जबाबदारी आहे. तर सीसीआयच्या वतीने ग्रेडर नियुक्त आहे. मात्र, ग्रेडरने ‘स्वाभिमानी’च्या प्रतिनिधींनी बाजार समितीत येऊ नये, अशी भूमिका घेतली. त्यावर जाब विचारण्यासाठी ‘स्वाभिमान’चे उत्तर महाराष्ट्र विभागीय प्रमुख घनश्याम चौधरी यांनी ग्रेडरशी संपर्क साधला. यावर बोलताना त्यांनी सांगितले की, बाजार समितीचे सभापती यांनी स्वाभिमानीचे प्रतिनिधी येथे येऊ नये असे सांगत दबाव आणत असल्याचे उत्तर दिले. त्यामुळे या प्रकरणाला अजूनच शंकेचे वळण लागले आहे. 

विक्रीपूर्वी शेतकऱ्यांना विक्री कूपन देणे व विक्री व्यवस्थेत समन्वय बाजार समितीकडे आहे. मात्र, शेतकऱ्याच्या प्रतिनिधींची अडचण कशासाठी होते? बाजार समितीमध्ये होणाऱ्या कापसाच्या खरेदीत ५ ते १० किलो कापसाची अनधिकृत कपात होते. त्याची नोंद कुठेही नसते. तसेच काही व्यापारी जर शिवार खरेदीमध्ये कमी दराने खरेदी केलेला कापूस शेतकऱ्यांच्या नावाखाली जास्त दराने सीसीआयकडे विक्री करीत आहे. मग असे शेतकऱ्यांच्या विरुद्ध कामकाज सुरू असताना बाजार समिती व ग्रेडर काय करतात असा सवाल ‘स्वाभिमानी’ने केला आहे. यावेळी ग्रेडर विरोध का करत नाही. त्यामुळे येथे गैरव्यवहार होत असल्याचा संशय घनश्याम चौधरी यांनी बोलून दाखवला. 

याबाबत स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्याकडे ही बाब आल्यानंतर त्यांनी तात्काळ पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क केला. यावेळी श्री. पाटील यांनी सगळी तक्रार ऐकून घेऊन व्हॉट्सअपवर संबंधित माहिती मागवली. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचा शब्द प्रदेशाध्यक्ष श्री. जगताप यांना दिला आहे. 

स्वाभिमानीच्या प्रतिनिधींना बाजार समितीत विरोध, क्विंटलमागे अनधिकृत कटती करून शेतकऱ्याना लुटलं जात आहे. यावर संघटना लक्ष ठेऊन होती. म्हणून त्यांचे गैरव्यवहार उघड होऊ नये यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बाजार समितीने दबाव टाकून प्रवेश बंद केला आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे.  - घनश्याम चौधरी, उत्तर महाराष्ट्र विभागीय प्रमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

बाजार समित्या शेतकऱ्यांच्या खरेदी विक्रीसाठी आहेत अन स्वाभिमानी शेतकरी संघटना जर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहत असतील तर बाजार समितीला नेमकी अडचण काय?  - संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष-स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com