स्वाभिमानीचा मोर्चा अडविला; साखर आयुक्तांबरोबर चर्चा सुरु

स्वाभिमानीचा मोर्चा अडविला; साखर आयुक्तांबरोबर चर्चा सुरु
स्वाभिमानीचा मोर्चा अडविला; साखर आयुक्तांबरोबर चर्चा सुरु

पुणे : ऊसात्या एफआरपीची तोडमोड न करता एकरकमी देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हल्लाबोल मोर्चा साखर संकूल परिसरात अडविण्यात आला. यानंतर स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली.  श्री. गायकवाड यांच्याबरोबर चर्चा सुरु केली.  केवळ आश्वासन नाही तर निर्णय झाल्याशिवाय माघार नाही असा इशारा खा. शेट्टी यांनी दिला आहे.

मोर्चाला सोमवारी (ता.२८) अलका टॉकीज चौकातुन प्रारंभ झाला होता. संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, स्वराज अभियानचे योगेंद्र यादव, रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या या मोर्चात राज्याच्या विविध भागागतुन शेतकरी सहभागी झाले आहेत. 

मोर्चा साखर आयुक्तालयावर काही वेळेत धडकणार असून, मागण्या पुर्ण होई पर्यंत आंदोलक शेतकरी हटणार नसल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. मोर्चाला सकाळपासून राज्याच्या विविध भागातुन शेतकरी मोठ्या संख्येने पुण्यात दाखल झाले. यावेळी शेतकऱ्यांनी घरुन आणलेली शिदोरी खाऊन मोर्चात सहभागी झाले. यावेळी शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत प्रतिकात्मक आसूड ओढला.  मोर्चा साखर संकूल जवळ अडविला.. video..

मोर्चा साखर संकूल जवळ अडविला.. video..

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com