पुणे ःकार्तिकी एकादशीनिमित्ताने पुणे बाजार समितीत मंगळवारी (ता. १९) रताळ्यांची सुमारे २० टन आवक झाली. या वेळी रताळ्यांना १०० ते २०० रुपये प्रतिदहा किलो असा दर होता. ही आवक कोल्हापूर, कराड, सोलापूर भागातून होत असून, आणखी दोन दिवस ही आवक सुरू राहील. गेल्या तीन ते चार दिवसांपासून रोज सरासरी २० टन आवक होत असल्याचे रताळ्याचे प्रमुख आडतदार सोमनाथ भोसले यांनी सांगितले. सध्या आवक आणि मागणी सरासरी असल्याने दर देखील स्थिर होते.
आषाढी आणि कार्तिकी एकादशीसाठी शेतकरी नियोजन करून रताळ्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात. यामध्ये आषाढीसाठी लागवडीचे प्रमाण जास्त आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी आणि पावसाचा परिणाम रताळे उत्पादनावर झाला असल्याने आवक कमी आहे. त्यास मागणीदेखील तुलनेने कमी असल्याने दर स्थिर आहे. कार्तिकी एकादशीला आळंदी येथे संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी दर्शनासाठी राज्यातून वारकरी दाखल होत असल्याने त्या भागातील लहान व्यावसायिकांकडून रताळ्याला मोठी मागणी असल्याचे श्री. भोसले यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.