ताकारीचे पाणी सोनी-भोसे शिवारात पोहोचले 

सांगली : ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे सुरू असलेले यंदाचे दुसऱ्या आवर्तनाचे पाणी मुख्य कालव्याच्या १४४ किलोमीटरवर सोनी-भोसे (ता. मिरज) मधील शिवारात पोहोचले आहे. त्याठिकाणी पुरेसा साठा केल्यानंतर सदरचे पाणी कालव्याच्या पाठीमागील भागात शेतकऱ्यांना गरजेनुसार दिले जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांनी दिली.
ताकारीचे पाणी सोनी-भोसे शिवारात पोहोचले
ताकारीचे पाणी सोनी-भोसे शिवारात पोहोचले

सांगली : ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे सुरू असलेले यंदाचे दुसऱ्या आवर्तनाचे पाणी मुख्य कालव्याच्या १४४ किलोमीटरवर सोनी-भोसे (ता. मिरज) मधील शिवारात पोहोचले आहे. त्याठिकाणी पुरेसा साठा केल्यानंतर सदरचे पाणी कालव्याच्या पाठीमागील भागात शेतकऱ्यांना गरजेनुसार दिले जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांनी दिली. 

यंदा उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यानंतर ७ मार्चपासून ताकारीचे दुसरे आवर्तन सुरू करण्यात आले होते. प्रथमतः महिन्यापूर्वी कुंभारगांव ते वांगीपर्यंतच्या २२ किलोमीटर कालव्यावरील वितरिकांतून शेतीला पाणी देण्यात आले. त्यानंतर १९ मार्चपासून पुढील प्रत्येकी २०-२५ किलोमीटरच्या टप्प्यात पाणी सोडून हे पाणी १५ दिवसांनी भाळवणी (ता. खानापूर) परिसरात ६५ किलोमीटरवर वितरीत करण्यात आले. तद्नंतर मजल-दरमजल करीत ताकारीच्या पाण्याने काल कालव्याच्या शेवठापर्यंत सोनी (ता. मिरज) येथे पोहोचले आहे. 

ताकारीमुळे कडेगांव, खानापूर, तासगांव आणि मिरज तालुक्यातील लाभक्षेत्रात पुढील महिनाभर कडक उन्हापासून पिकांच्या बचावासाठी आणि पिण्यासाठी मुबलक पाणी झाले आहे. तसेच सदर तालुक्यातील बहुतांश शेतीला तसेच गावांना पिण्याचे पाणी या योजनेमुळे उपलब्ध होते. तसेच झिरपणारे पाणी येरळेत पोहोचल्याने येरळा नदी प्रवाहित झाली आहे. 

सध्या योजनेचे टप्पा १ साटपेवाडी बंधाऱ्यावरील आणि टप्पा २ सागरेश्वरमधील प्रत्येकी ११ पंप सुरू आहेत. त्यामुळे मुख्य कालवा तुडुंब भरून वाहत आहे. मात्र, कडक उन्हाळा, पाण्याचे होणारे बाष्पीभवन, जमिनीत मुरण्याचे अधिक प्रमाण यामुळे पाणी मंदगतीने पुढे सरकत आहे. शिवाय टप्पा ३ व ४ वरील प्रत्येकी दोन पंप सुरू करून पाणी सोनहिरा खोऱ्यातही सुरूच आहे. 

कालपासून काही प्रमाणात पाणी भिकवडी येथून येरळा नदीतही सोडले आहे. येरळेवरील सर्व बंधारे भरून पाणी कृष्णा नदीला पोहोचेपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच उर्वरित कालव्यावरील गरज असणाऱ्या शेतीला आणखी पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांची पाणी मागणी आवश्यक असल्याचे कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांनी सूचित केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com