केळीचे पंचनामे न करणाऱ्यांवर कारवाई करा

केळीचे पंचनामे न करणाऱ्यांवर कारवाई करा
केळीचे पंचनामे न करणाऱ्यांवर कारवाई करा

जळगाव : वादळ व गारपिटीने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील केळी क्षेत्राचे पंचनामे न करणाऱ्या दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करा, शेतकऱ्यांनी न्यायालयात खटले दाखल करावेत, असे आदेश बुधवारी (ता. १) जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी शेतकरी, विमा कंपनी व कृषी विभागासोबत झालेल्या बैठकीत दिले.

बैठकीत शेतकरी विशाल महाजन, महेश महाजन, सत्त्वशील पाटील, विमासंबंधी नियुक्त केलेल्या एचडीएफसी एर्गो कंपनीचे जिल्हा समन्वयक महेश पवार, अग्रणी बॅंक, जिल्हा बॅंकेचे अधिकारी उपस्थित होते.

विमाधारक केळी उत्पादकांनी त्वरित विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर नुकसानीबाबत संपर्क साधला. ई-मेल, फॅक्‍सदेखील केले. ३१ जुलै रोजी विमा सुरक्षा कालवधी संपला. तरीही सुमारे एक हजारांवर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. शेतकऱ्यांचे काही बरेवाईट झाल्यास त्यास विमाकंपनी जबाबदार राहील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

विमा कंपनीने केळी विमाधारकांची माहिती शासनाच्या पोर्टलवर टाकलेली नाही. अजून ५ हजार ५०० विमाधारकांची माहितीच या पोर्टलवर बॅंकांनी भरली नाही. बॅंकांच्या चुकांमुळे पंचनामे रखडले आहेत, असा दावा विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी केला. त्यावर जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात शेतकऱ्यांनी न्यायालयात जाऊन खटले भरावेत व दोषींवर कायदेशीर कारवाई सुरू करावी, असे आदेश दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com