विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्या

विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्या
विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्या

औरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे. ॲड. व्ही. सी. सरोदे फुलंब्रीकर यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटल्यानुसार लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात ईव्हीएम मशिनचा गैरवापर झाला होता. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक करणे अथवा छेडछाड करण्याचे प्रकार होऊ शकतात. तसेच ईव्हीएम मशिनद्वारे झालेले मतदान फेरफार करणे अथवा विशिष्ट उमेदवारास मते हस्तांतरित करणे असे गैरप्रकार होऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना, मनसे, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पार्टी, एमआयएम यांसह अन्य राजकीय पक्षांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. तरीही निवडणूक आयोगाने असमर्थता दर्शवली आहे. याबाबत विविध दैनिकांमध्ये बातम्याही छापून आल्या आहेत. लोकशाही सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने बॅलेट पेपरद्वारे मतदान घेतल्यास योग्य व्यक्ती निवडून येण्यास पात्र ठरेल. त्यामुळेच सामाजिक एकता जोपासली जाईल व लोकशाही टिकून राहील, अशी अपेक्षा याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे. ॲड. व्ही. सी. सरोदे फुलंब्रीकर यांच्यामार्फत ॲड. फातेमा काझी काम पाहत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com