बियाणे संबंधित तक्रारींचा तत्काळ निवाडा करावा

निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर बियाणे कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तक्रार निवारणासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.
dada-bhuse.jpg
dada-bhuse.jpg

नाशिक: निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर बियाणे कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तक्रार निवारणासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. प्राप्त तक्रारींचा कृषी विभागाने तात्काळ निवाडा करावा, अशा सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी कृषी विभागाला दिल्या.  खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सटाणा, देवळा व कळवण तालुक्यात रविवारी (ता.१२) शेतकरी संवाद दौरा आयोजित करण्यात आला होता. यानंतर सटाणा येथे पदाधिकारी व कृषी विभागाच्या बैठकीत कृषिमंत्री बोलत होते. कृषिमंत्री भुसे म्हणाले ‘‘महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या अनुषंगाने ८७० कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहे. याच निधीतून शेतकऱ्यांना पीक कर्जाचा पुरवठा करण्याचे निर्देशही जिल्हा बँकांना देण्यात आले आहेत. अर्ली द्राक्ष निर्यात धोरणाबद्दल पुढील आठवड्यात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.’’ कृषिमंत्र्यांनी अंबासन येथील जगदीश सावंत यांच्या सीताफळ बागेला भेट दिली. त्यानंतर टेंभे येथील पॅकहाऊस व ओम हायटेक नर्सरीची पाहणी केली. खतांचा साठा करू नका राज्यात कुठेही खतांची कमतरता भासणार नाही. कोरोनाच्या संकटामुळे वितरण व्यवस्थेमध्ये थोडी फार तफावत होईल परंतु एकही शेतकरी खते व बियाण्यापासून वंचित राहणार नाही. कुणी चढ्या दराने विक्री करत असेल त्यावर कडक कारवाई करण्यात येईल. राज्यासाठी ५० हजार टन खताचा बफर स्टॉक कृषी विभागाकडे असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विनाकारण खताचा साठा करू नये, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com