फळबागा वाचविण्यासाठी शास्त्रोक्‍त पद्धतीने उपाय करावेत : डॉ. भुजबळ

आपत्कालीन स्थितीत मार्ग काढा ः डॉ. भुजबळ
आपत्कालीन स्थितीत मार्ग काढा ः डॉ. भुजबळ

औरंगाबाद  : आपत्कालीन परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या फळबागा वाचविण्याला प्राधान्य देऊन शास्त्रोक्‍त पद्धतीने उपाय करावेत, असे कृषी विज्ञान केंद्र औरंगाबादच्या विषय विशेषज्ञ डॉ. दर्शना भुजबळ यांनी स्पष्ट केले.

लाखेगाव येथे ‘आपत्कालीन परिस्थितीत फळबाग वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी करावयाच्या उपाययोजना’ याविषयी त्या मार्गदर्शन करीत होत्या. या वेळी कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक प्रा. दीप्ती पाटगावकर यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

डॉ. भुजबळ म्हणाल्या, पाणीटंचाईच्या काळात फळबागा वाचविण्याचे भीषण आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. त्या अनुषंगाने आपत्कालीन परिस्थितीत फळबागेचे नियोजन करताना सेंद्रिय आच्छादनाचा वापर, ठिबक संचाचा वापर, बाष्परोधकाची फवारणी घेणे, खोडास बोर्डोपेस्ट लावणे, झाडांचा पर्णभार, पानोळा व फळसंख्या कमी करणे आदी उपाय योजनांचा अवलंब शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे.

या वेळी प्रा. पाटगावकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतावरील प्रयोगांतर्गत असलेल्या मल्चिंग व क्रॉप कव्हरचा वापर करून लागवड केलेल्या टोमॅटो व मिरची प्लॉटला या वेळी भेट देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com