भुसावळ, जि. जळगाव : भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धरणाची पातळी वाढली आहे. धरणाचे दहा दरवाजे पूर्ण उघडण्यात येऊन, तापी नदीपात्रात १७ हजार ९२ क्युसेक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या १५ ते २० दिवसांपासून दडी मारून बसलेल्या वरुणराजाने मर्जी दाखवीत, शेती पिकासाठी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जळगाव जिल्ह्यात आगमन केले आहे. सध्या जिल्हाभरात चांगला पाऊस आहे.
धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग
हतनूर धरणातून भुसावळ तालुक्यासह रेल्वे, वरणगाव आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक केंद्रांसह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, यावल, सावदा मोठ्या पालिका व बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर एमआयडीसी तसेच तब्बल १३० गावांना पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरणाची पातळी २०९.१९० मीटरवर जाऊन, ४४.५१ टक्के साठा उपलब्ध झाला आहे. धरणात पाण्याची आवक वाढत आहे. १७ हजार ९२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे, तर कालव्याद्वारे ३०० क्युसेक पाणी सिंचनासाठी सोडले जात आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.