कुठे किती रुग्ण आहेत? याची चर्चा; सरकारला धोका नाही : पवार 

बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर एकदाच 'मातोश्री'वर गेलो होतो. यावेळी आम्ही कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. कोरोना काळात कशी काळजी घेतली पाहिजे याची चर्चा झाली. कुठे किती रुग्ण आहेत? पावसाळ्यात काय काळजी घ्यायची? रुग्ण संख्या वाढते आहे यावर चर्चा झाली : शरद पवार
कुठे किती रुग्ण आहेत? याची चर्चा; सरकारला धोका नाही : पवार 
कुठे किती रुग्ण आहेत? याची चर्चा; सरकारला धोका नाही : पवार 

मुंबई: राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून महाराष्ट्र सरकारला कोणताही धोका नाही, असा निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (ता.२६) दिला. महाराष्ट्र विकास आघाडीतील सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. जर सध्याच्या परिस्थितीत आमदारांना फोडण्याचा प्रयत्न झाला तर जनता माफ करणार नाही, असा इशाराही पवार यांनी भाजपला नाव न घेता दिला. देवेंद्र फडणवीस उगाच उतावीळ होत असल्याचेही पवार म्हणाले. 

कोरोनाच्या साथीमुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी उशीरा 'मातोश्री' वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. पवार- ठाकरे गुप्त भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा सुरु झाली. अशातच भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी सुद्धा राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केल्याने राजभवनाच्या आडून केंद्र सरकार महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  यापार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना पवार यांनी राज्यपाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत खुलासा केला. राज्यपालांची भेट घेतली यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. त्यांनी दोन वेळा चहासाठी निमंत्रण दिले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये राहण्यास आपण कटिबद्ध आहोत, असे पवार म्हणाले. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना पक्ष एकत्र आहेत. कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर कसे काढायचे आणि त्यासाठी सगळी ताकद लावायची हे सध्या सरकारचे उद्दिष्ट आहे. तिन्ही पक्षाची हीच भूमिका आहे, असेही पवार यांनी सांगितले.  भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल झाल्यापासून एकदाही त्यांना भेटलो नव्हतो. त्यांनी चहासाठी दोन वेळा निमंत्रण दिले होते. म्हणून त्यांना भेटायला गेलो होतो. मुख्यमंत्री महाराष्ट्रात चांगले काम करत आहेत. तुम्ही सगळे एकत्र काम करत आहात असे राज्यपाल म्हणल्याचे पवारांनी सांगितले.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी नेहमी आढावा घेतो. नेहमी स्मारकवर भेटतो. मीच मातोश्रीला येतो असे उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर एकदाच 'मातोश्री'वर गेलो होतो. यावेळी आम्ही कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. कोरोना काळात कशी काळजी घेतली पाहिजे याची चर्चा झाली. कुठे किती रुग्ण आहेत? पावसाळ्यात काय काळजी घ्यायची? रुग्ण संख्या वाढते आहे यावर चर्चा झाली, असंही पवार म्हणाले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींसह इतर गप्पा झाल्याचेही पवारांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com