नगर जिल्ह्यामध्ये अद्याप तीस टक्के बियाणे शिल्लक

नगर जिल्ह्यामध्ये अद्याप तीस टक्के बियाणे शिल्लक
नगर जिल्ह्यामध्ये अद्याप तीस टक्के बियाणे शिल्लक

नगर : जिल्ह्यामध्ये यंदा खरिपासाठी पुरवठा करण्यात आलेल्या बियाण्यांपैकी जवळपास तीस टक्के बियाणे यंदा शिल्लक आहेत. सर्वाधिक बाजरी आणि उडदाचे बियाणे शिल्लक असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून देण्यात आली. जिल्हाभरात आतापर्यंत ७३ टक्के पेरणी झाली आहे.

नगर जिल्ह्यामध्ये यंदा पावसाला पंधरा दिवस उशिराने सुरवात झाली. गेल्या वर्षभर दुष्काळाच्या गंभीर झळा सोसल्यानंतर यंदा चांगला पाऊस होईल, अशी आशा होती, मात्र पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे खरिपाची पेरणीवर परिणाम झाला. काही भागात केवळ भरवशावर पेरणी झाली. गेल्या चार दिवसांपासून सर्वदूर पाऊस पडत असताना येथे मात्र केवळ रिमझीम पाऊस सुरू आहे. त्यामुळे खरिपाची पेरणी झाली असली तरी पाणीसाठा नसल्याने धास्ती कायम आहे.

खरिपासाठी गेल्या तीन वर्षांतील सरासरी आणि बियाण्यांच्या विक्री अंदाजानुसारच बियाण्यांची मागणी केली होती. मागणी केल्यानुसार आत्तापर्यंत ५८ हजार ५६८ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला होता. त्यातील ३६ हजार ७५२ क्विंटल बियाण्यांची विक्री झालेली असून, यंदा आत्तापर्यंत २१ हजार ८१६ क्विंटल बियाणे शिल्लक आहे.

गेल्या वर्षीही परणी झालेली नसल्याने मोठ्या प्रमाणात बियाणे शिल्लक होते. यंदा आता जवळपास सर्वच पिकांच्या पेरणीचा कालावधी संपलेला असल्याने हे बियाणे शिल्लक राहण्याची शक्यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com