सांगली : सांगली जिल्ह्यातील तीस हजारावर शेतकऱ्यांना गतवर्षी उतरवलेल्या रब्बी पिकाचा विमा पंधरा कोटी रुपये मंजूर झाला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती होती. याआधी विशेषत: पूर्वभाग अक्षरशः होरपळून निघाला. जत, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ खानापूर या भागातील रब्बी पिके पूर्ण वाया गेली होती. संपूर्ण जिल्हाभर टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. अपवादात्मक एखादा दुसरा पाऊस वगळता पाऊस झालाच नव्हता. त्यामुळे रब्बी ज्वारी, मका, गहू, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले.
जिल्ह्यातील तीस हजारांवर शेतकऱ्यांनी रब्बी पिकाचा विमा भरला होता. खरेतर रब्बी हंगामाच्या समाप्तीनंतर विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर या भागातील शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. गेल्या आठवड्यात कंपनीने जिल्ह्यासाठी मंजूर केलेली रक्कम बॅंकाकडे वर्ग केली आहे.
जिल्ह्यासाठी १४ कोटी २१ लाख रुपये विमा बॅंकांकडे जमा केला आहे. तर ९० लाख रुपये विविध अडचणीमुळे कंपनीने ठेवून घेतले आहे. राज्य सरकारनेही किमान एक हजारावर तरी नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश दिले आहेत. मंजूर केलेली विमा रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम बॅंकांनी वेगात सुरू केले आहे. या आठवड्यात ही रक्कम खात्यात १०० टक्के जमा होऊन शेतकऱ्यांना मिळेल.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.