औरंगाबादमध्ये टॅंकरवर २ लाख ९१ हजार लोकांची तहान

औरंगाबादमध्ये टॅंकरवर २ लाख ९१ हजार लोकांची तहान
औरंगाबादमध्ये टॅंकरवर २ लाख ९१ हजार लोकांची तहान

औरंगाबाद : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जिल्ह्यातील १७६ गावांतील २ लाख ९१ हजार ५९९ लोकांची तहान टॅंकरवर असून, त्यांना २०४ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यात टंचाईच्या सर्वाधिक झळा बसत आहेत. गंगापूर तालुक्‍यात ७६ गावांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यापाठोपाठ पैठण तालुक्‍यातील ४२, वैजापूर ३७, सिल्लोड १४, फुलंब्री ४, औरंगाबाद ३ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या टंचाईग्रस्त गावातील लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी २०४ टॅंकरची सोय करण्यात आली आहेत. त्यामध्ये औरंगाबाद तालुक्‍यात ६, गंगापूर ७९, पैठण ४६, फुलंब्री ४, सिल्लोड २१, तर वैजापूर तालुक्‍यातील ४८ टॅंकरचा समावेश आहे. पाणीपुरवठा टॅंकरच्या ४१५ खेपा मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये औरंगाबाद तालुक्‍यात १२, गंगापूर १६१, पैठण ९५, फुलंब्री ९, सिल्लोड ४२ तर वैजापूर तालुक्‍यातील ९६ खेपांचा समावेश आहे. प्रत्यक्षात ४११ खेपांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

पैठण तालुक्‍यात ३ व फुलंब्री तालुक्‍यात एक मिळून चार खेपा २२ ऑक्‍टोबरअखेरच्या अहवालानुसार कमी झाल्या आहेत. ६७ गावात टॅंकरसाठी तर १२ टॅंकर व्यतिरिक्‍त गावांना पाणीपुरवठ्यासाठी ८० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये गंगापूर तालुक्‍यातील ३२, फुलंब्री ८ तर वैजापूर तालुक्‍यातील ४० विहिरींचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com