‘त्या’ ४५ गावांना चारा दावणीला मिळावा

‘त्या’ ४५ गावांना चारा दावणीला मिळावा
‘त्या’ ४५ गावांना चारा दावणीला मिळावा

सोलापूर ः निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या मंगळवेढा तालुक्‍यातील कायम दुष्काळी ४५ गावांतील ग्रामपंचायतींनी ठराव करून दुष्काळी परिस्थितीत चारा दावणीला द्यावा, अशी एक मुखी मागणी तहसीलदार यांच्याकडे केली असल्याची माहिती कोरडवाहू संघर्ष समितीचे निमंत्रक अंकुश पडवळे यांनी दिली.

सध्या गावात भीषण चाराटंचाई निर्माण झाली आहे. सहा ठिकाणी रास्ता रोको केल्यानंतर प्रशासनाने चारा नियोजनाबाबत जलद हालचाली केल्या आहेत. तालुक्‍यातील शेतकऱ्यांची मागणी व चाराटंचाईबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. तसेच गावातील तलाठी चारा छावणी मागणी अर्ज भरून घेतले जात आहेत.

दरम्यान पावसावर अवलंबून असणाऱ्या तालुक्‍यातील ४५ गावांतील सर्वच ग्रामपंचायतींनी ग्रामपंचायतींच्या ठरावाद्वारे चारा दावणीला मिळावा, अशी मागणी तहसीलदार अप्पासाहेब समिंदर यांच्याकडे केली आहे. रास्ता रोको आंदोलनाप्रसंगीही सर्व शेतकऱ्यांनी चारा छावणीऐवजी दावणीलाच मिळावा, अशी एकमुखी मागणी केली होती.  

तसेच मागील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व पशुसंर्धनमंत्री महादेव जानकर यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार चारा दावणीला व छावणीतही दिला जाईल, असे जाहीर केले होते. पण दावणीबाबतचा निर्णय अद्याप झालेला दिसून येत नाही. याबाबत मंगळवेढा तालुक्‍यातील या सर्व गावांनी ठराव करून चारा दावणीलाच द्यावा, अशी मागणी केली आहे. सध्या शेतकऱ्यांचा चारा संपला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com