राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे खुले

राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे खुले
राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे खुले

कोल्हापूर  : जिल्ह्याचे महत्त्वाचे समजले जाणारे राधानगरी धरण बुधवारी (ता. ३१) सकाळी साडेअकरा वाजता पूर्ण भरले. साडेअकरा ते बाराच्या दरम्यान धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले तर दुपारी एकच्या दरम्यान तिसरा दरवाजा उघडला. या तिन्ही दरवाजे व विद्युतनिर्मिती केंद्रामधून एकत्रित ५६०० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू झाला आहे. पावसाचा जोर कमी असला तरी धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने भोगावतीसह पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्‍यता आहे. यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या गावातील लोकांना दक्षतेचा इशारा पंचगंगा पाटबंधारे उपविभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिला आहे. बुधवारी पावसाचा जोर कमी झाला असला, तरी ४ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्याने प्रशासन यंत्रणा गतिमान झाली आहे. अद्यापही विविध नद्यांवरील ८१ बंधारे पाण्याखाली आहेत, तर जिल्ह्यातील ४० मार्ग बंद असल्याने या मार्गावरील बस व अन्य वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. संततधार पाऊस नसला तरी थांबून थांबून पावसाच्या सरी जिल्ह्यात सुरूच होत्या. अनेक ठिकाणी कडक उन्हानंतर जोरदार वृष्टी अशी स्थिती होती.  काळम्मावाडी, वारणा धरणाच्या पाण्यासाठ्यातही वाढ होत असून या धरणांचा पाणीसाठा ७५ टक्क्‍यापर्यंत गेला आहे. तर राजाराम पुलाजवळ पंचगंगेची पातळी ४० फुट इतकी होती. सध्या पाण्याची पातळी इशारा पातळीच्या वर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com