सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर धोकादायक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी शिरशिंगे, झोळंबे आणि तुळस हे तीन डोंगर धोकादायक असल्याचा अहवाल भूगर्भ तज्ज्ञांकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे या डोंगरपायथ्याशी असलेल्या वाड्यांचे अन्यत्र पुनर्वसन करावे लागणार आहे.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दोडामार्ग तालुक्यातील झोंळबे, सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे, तुळस, असनिये, वेंगुर्ला तालुक्यातील पाल, कुडाळ तालुक्यातील सरबंळे येथील डोंगर खचले होते. काही ठिकाणी डोंगरांना भेगा; तर काही ठिकाणी भुस्खलनासारखे प्रकार घडले होते. यातील बहुतांशी डोंगराच्या पायथ्याशी लोकवस्ती आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने असे प्रकार घडलेल्या डोंगराची भूगर्भ तज्ज्ञांकडून तपासणी सुरू केली. सुरुवातीला तपासणी केलेल्या काही डोंगराचा धोका नसल्याचा अहवाल भूगर्भ तज्ज्ञांनी दिला होता; परंतु आता शिरशिंगे, झोळंबे आणि तुळस या डोंगरांपासून लोकवस्तीला धोका असल्याचा अहवाल भूगर्भ तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे पावसामुळे निर्माण होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी ही वस्ती हटवून अन्यत्र पुनर्वसन करावे लागणार आहे.

या संदर्भात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच आपली भूमिका जाहीर केली आहे. भूगर्भ तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार शासन जलदगतीने पावले उचलणार आहे. डोंगरपायथ्याशी असलेल्या वाड्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. याशिवाय कुडाळ तालुक्यातील सरबंळे येथे संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. या भिंतीकरिता ६० लाखांचा निधी आवश्‍यक आहे. त्या निधीची तरतूद देखील तातडीने करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com