सिंधुदुर्गनगरी ः तिलारी धरणाचा डाव्या कालव्यावर असलेला उपकालवा बुधवारी (ता.१२) पुन्हा मणेरी येथे फुटला. या कालव्यातून वाहणारे हजारो लिटर पाणी शेतीत घुसले. त्यामुळे शेतीसह पिकांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे या परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तिलारी धरणाचे कालवे फुटण्याचे सत्र सातत्याने सुरू आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवरील तिलारी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात दोन्ही राज्यांतील अनेक गावे येतात. परंतु या धरणाचे कालवे सातत्याने फुटण्याचे प्रकार सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी गोव्याकडे जाणारा कालवा फुटल्यामुळे मोठे नुकसान झाले होते. या शिवाय काही दिवस पाणीदेखील बंद करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच बुधवारी उपकालवा मणेरी येथे फुटला. या कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. नव्याने पेरणी केलेल्या विविध पिकांचे नुकसान झाले आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी ही माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर उपअभियंता एस. डी. अंबी, एस .एस. सिंघवी हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कालव्याचे काम करीत असलेले ठेकेदार धनंजय पाटील यांना संपर्क साधून तत्काळ कालवा दुरुस्तीचे काम करण्याच्या सूचना केल्या. या कालव्याच्या सद्यःस्थितीची माहिती काही दिवसांपूर्वीच शेतकरी अजय कुबल यांनी अधिकाऱ्यांना दिली. धोका ओळखून दक्षता घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.