टंचाई आराखड्यातील कामे मार्चअखेरपर्यंत करा : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

जिल्ह्यात सध्या ५५ टॅंकर सुरू असून, तीन महिन्यांत टॅंकरची मागणी आणखी वाढणार आहे. जिल्ह्यात जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. टंचाईअंतर्गत २०० नवी कामे पूर्ण झाली आहेत. आठशे कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सहाशे कामे निविदा स्तरावर आहेत. - नवल किशोर राम, जिल्हाधिकारी
टंचाई आराखड्यातील कामे मार्चअखेरपर्यंत करा : जिल्हाधिकारी
टंचाई आराखड्यातील कामे मार्चअखेरपर्यंत करा : जिल्हाधिकारी

पुणे : दुष्काळ निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने टंचाई आराखड्यांतर्गत आठशे कामांना प्रशासकीय मान्यता दिली. सहाशे कामे निविदा स्तरावर आहेत. जिल्ह्यात टंचाई आराखड्याअंतर्गत करण्यात येणारी कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला. 

जिल्ह्यातील दुष्काळ निवारणाच्या कामांबाबत जिल्हा परिषदेच्या तालुका स्तरावरील अधीक्षक अभियंत्यांची बैठक झाली. या बैठकीत हे आदेश दिले. राज्य सरकारने सुरवातीला जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. दुसऱ्या टप्प्यात आणखी पाच तालुक्यांतील १९ महसुली मंडळांचा समावेश करण्यात आला. मावळ तालुका वगळता जिल्ह्यातील अन्य सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे.

महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने गावनिहाय परिस्थितीचा आढावा घेऊन टंचाई आराखडा तयार केला आहे. टंचाई आराखड्याअंतर्गत जिल्ह्यात विविध प्रकारची दोन हजार ७१८ कामे सुचविण्यात आली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com