तीन जिल्ह्यांतील सहकारी संस्थांच्या वार्षिक सभांना मुदतवाढ ः सहकारमंत्री

सहकारमंत्री सुभाष देशमुख
सहकारमंत्री सुभाष देशमुख

मुंबई ः सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळित झाले होते. पूरग्रस्तांच्या अडचणी लक्षात घेऊन सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी एक महिन्यांची म्हणजेच ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सहकार व मदत पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७५ अन्वये राज्यातील सहकारी संस्थांचे कामकाज चालविण्यासाठी प्रत्येक सहकारी संस्था वित्तीय वर्ष संपल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीच्या आत आपल्या सदस्यांची अधिमंडळांची वर्षिक सभा घेतील अशी तरतूद आहे. या तरतुदी नुसार सहकारी संस्थांनी त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत आयोजित करणे आवश्यक आहे. परंतु सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी या जिल्ह्यांमधील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी एक महिन्याची म्हणजेच ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, असे श्री. देशमुख यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com