पिण्याच्या पाण्यासाठीच्या कामांना १५ जूनपर्यंत मुदतवाढ ः चंद्रकांत पाटील

मंत्री चंद्रकांत पाटील
मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : सर्व जिल्ह्यांतील दुष्काळाचा आढावा संबंधित पालकमंत्र्यांनी घेतला असून, दुष्काळी भागांतील मागणी व सूचनेनुसार दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना प्राधान्याने करण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी निविदा प्रक्रियांच्या कामांना १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

दुष्काळाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाल्यानंतर ते बोलत होते. या वेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, की पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी प्राधान्य क्रमाने पाणीपुरवठा करण्यात येत आहेत. ज्या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता आहे, त्या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गरज भासल्यास रेल्वेनेसुद्धा पाणीपुरवठा केला जाईल. सातारा जिल्ह्यामधील माण तालुक्यातील म्हसवड गावास विशेष बाब म्हणून दहा हजार जनावरांच्या छावणीस परवानगी देण्यात आली आहे. दुष्काळी भागात शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांमधील पशुधनाच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापरण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी छावण्यांमधील जनावरांना बारकोड असलेले टॅग लावण्यात येत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com