`काळानुसार शेती करण्याची गरज`

`काळानुसार शेती करण्याची गरज`
`काळानुसार शेती करण्याची गरज`

ईट, जि. उस्मानाबाद :  शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनचा वापर करावा. शेतातील पाणी शेतात अडवावे. बांध- बंदिस्थी करावी. सध्या काळानुसार शेती करण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला. 

कृषी विभागातर्फे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान पंधरवडा २५ मे ते ८ जून या दरम्यान राबविण्यात येत आहे. त्यातंर्गत घाटनांदुर येथील जनावरांच्या चारा छावणीत बुधवारी (ता. २९) सकाळी ११ वाजता कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी वसुधरा पाणलोटचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, कृषी उपविभागीय अधिकारी बी. यू. मंगरुळकर, कृषी उपविभागीय भास्कर कोळेकर, तालुका कृषी अधिकारी गणेश दुरुंदे, मंडळ कृषी अधिकारी आर. आर. तांबोळी, कृषी पर्यवेक्षक जीवनकुमार राऊत यांची उपस्थिती होती.

कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळणारी पिके शेतकऱ्यांनी घ्यावी. बियाण्यांची उगवण तपासावी, असे मार्गदर्शन तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना केले.

कृषी सहायक अण्णासाहेब खटाळ, बजरंग गोयकर, कैलास हुंबे, विलास भडके, अरुण हुंबे, सोमनाथ बेरगळ, रोहित ऐडके आदी शेतकरी, पशुपालक उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com