कर्जमाफीविषयक तक्रारींसाठी आता टोल फ्री क्रमांक : सहकारमंत्री

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर  ः छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत आजवर ३७ लाख ७८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांत कर्जमाफीची रक्‍कम वळती करण्यात आली आहे. परंतु अद्यापही निम्मे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याने त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी टोल फ्री क्रमांक कार्यान्वित केला जाईल, अशी घोषणा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विधान परिषदेत केली.

राज्यात ९० लाख खातेदार होते; परंतु कर भरणारे आणि नोकरदार यांना वगळल्यानंतर ही संख्या ७० लाखांवर आली. या ७० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असून, आजवर ३७ लाख ७८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांत कर्जमाफीची रक्‍कम वळती कली आहे.

काही शेतकऱ्यांचे खाते क्रमांक तर काही शेतकऱ्यांची नावे मिसमॅच होत असल्याने त्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही. यादीतील अशा त्रुटी दूर करण्यासाठी या याद्या तालुका स्तरावर पाठविल्या जातात. आजवर नऊ वेळा याद्या अपडेट करून यादीत नव्याने समावेश झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला गेला. राज्यातील एकही शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत राहू नये, हे सरकारचे धोरण असल्याचे श्री.देशमुख यांनी सांगितले.

बॅंकांकडून कर्जमाफीसाठी किती रक्‍कम लागेल याचा माहिती सुरवातीला घेण्यात आली. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांकरीता सुमारे ३४ हजार कोटी रुपयांची गरज असल्याचे बॅंकांकडून प्राप्त आकडेवारीनंतर समोर आले, असेही श्री. देशमुख यांनी लक्षवेधी प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com