केंद्रीय पथकाचा दौरा म्हणजे ‘बैल गेला अन् झोपा केला’

A tour of the Central Squad is called 'The bull went and slept'
A tour of the Central Squad is called 'The bull went and slept'

अमरावती ः मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाने विदर्भाचा दौरा केला. बहूतांश शेतकऱ्यांनी रब्बी पिकांकरीता शेतीची मशागत आटोपली. त्यापूर्वी बुरशी आलेले सोयाबीनही विकून टाकले. त्यामुळे हा दौरा म्हणजे साप गेल्यावर फरकांडीवर मारण्यासारखा ठरल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे.

अमरावती विभागातील अकोल, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात सुमारे ३२ लाख हेक्‍टर खरिपाचे क्षेत्र आहे. महसूल व कृषी विभागाच्या संयुक्‍त पाहणी, सर्वेक्षण व पंचनाम्यात यापैकी सुमारे २२ लाख हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल देण्यात आला आहे. यामध्ये संत्रा, मोसंबी तसेच इतर फळपिकांचे २७७४ हेक्‍टर क्षेत्रावरील नुकसानीची नोंद आहे. 

सोयाबीन काढणीच्या वेळी हा पाऊस झाल्याने त्यांचा फटका या पिकाला सर्वाधिक बसला. सोयाबीन काढणी केल्यानंतर शेतात तसेच पडून राहिल्याने सोयाबीनला कोंब फुटले, कपाशीची बोंड काळवंडली अशाप्रकारे नुकसान झाले. संत्रा फळगळही मोठ्या प्रमाणावर झाली असली, तरी फळपिकाचे केवळ २७७४ हेक्‍टरचे नुकसान अहवालात नमूद आहे. त्यामुळे फळपीकधारकांना मोठी मदत मिळेल, अशी अपेक्षा अमरावती विभागातील जिल्ह्यांमध्ये नाही. शेतीपिकाचे नुकसानीला महिनाभराचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी शेतातील खराब सोयाबीनची मळणी केली आणि मिळेल त्या भावात विकून टाकले. आता रब्बीसाठी शेतीची मशागत पूर्णत्वास गेली आहे. अशा वेळी केंद्राच्या पथकाने पाहणी करून नेमके काय साधले? असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे.

केंद्रीय कापूस विका संचलनालयाचे संचालक आर. पी. सिंग यांनी शुक्रवार (ता. २२) पासून पश्‍चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम जिल्ह्यात पाहणी केली. अमरावती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे त्यांच्यासोबत या दौऱ्यात होते. परंतु केंद्रीय कृषी पथकाचा हा दौरा म्हणजे ‘बैल गेला अन् झोपा केला’ या पठडीतील ठरल्याची चर्चा रंगली आहे.

शेतीमाल हा नाशवंत असतो याची माहिती असतानासुद्धा नुकसानीची पाहणी करण्याकरिता येण्यासाठी पथकाला तब्बल एक महिना लागला, हा प्रकार दुर्दैवी आहे. सरकारला शेतकऱ्यांप्रती काही देणेघेणे नाही हेच यावरून सिद्ध होते. यापूर्वी राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तोंडाला पाने पुसण्यासारखी ठरली असताना केंद्रीय पथकाच्या जाण्यायेण्याने शेतकऱ्यांचे दुःख दूर होईल, ही अपेक्षाही चुकीचे ठरेल. - आमदार देवेंद्र भुयार, मोर्शी, अमरावती 

सोयाबीन काढणेही परवडणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी ते तसेच शेतात ठेवले आहे. कपाशीची उत्पादकता प्रभावित झाली आणि प्रतही खालावली. केंद्रीय पथकाला डागाळलेले सोयाबीन दाखविण्यात आले आणि भरीव मदतीसाठी निवेदन दिले आहे.  - प्रकाश मानकर, अध्यक्ष, भारत कृषम समाज, महाराष्ट्र

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com