दिल्लीत शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा 

आंदोलक शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला विराट ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले आहे.
tractor march
tractor march

नवी दिल्ली ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत असून, त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलक शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला विराट ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले आहे. त्याची झलक म्हणून गुरुवारी (ता. ७) दिल्लीच्या सीमांवर ट्रॅक्टर मोर्चा काढला. 

‘‘आम्ही २६ जानेवारीला किसान गणतंत्र दिवस साजरा करणार आहोत. त्याची आज पूर्वतयारी म्हणून ट्रॅक्टर रॅली काढली,’’ असे सीम्रणजित यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी दिल्ली येथे चार सीमांवर ट्रॅक्टर मोर्चा काढला. पूर्व महामार्गावरील कुंडली-मनेसार-पालवाल आणि सिंघू सीमेवर मोठ्या प्रमाणात शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ट्रॅक्टर मोर्चा दसना, अलिगड रोड आणि गाझीपूर असा निघाला. ट्रॅक्टर मोर्चासाठी शेतकरी गुरुवारी सकाळपासूनच तयारीत होते. सकाळीच मोठ्या प्रमाणात शेतकरी सिंघू सीमेवर एकत्र आले होते. त्यानंतर त्यांनी मोर्चा काढला.  ‘‘शेतकऱ्यांनी शांतता पाळावी. शेतकऱ्यांना शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र कम्युनिस्टांसारखे लोक शेतकऱ्यांना चुकीची माहिती देत आहेत. त्यांना देशात शांतता नको आहे. उद्याच्या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल, असा मला विश्‍वास आहे,’’ असे कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com