कांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांना मिळणार तीन दिवसांचा अवधी

बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्यांना हाताळणी व प्रतवारी करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी मिळणार आहे.
कांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांना मिळणार तीन दिवसांचा अवधी
कांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांना मिळणार तीन दिवसांचा अवधी

नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्यांना हाताळणी व प्रतवारी करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी मिळणार आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने कांद्याचे लिलाव सुरळीत होऊन कांदा व्यापाऱ्यांना काम करता यावे या हेतूने हा अवधी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती पवार यांनी दिली. 

कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदीनंतर व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर केंद्रीय आदेश ३७७६ ‘अ’ नुसार २३ ऑक्टोबर रोजी मर्यादा आणली. श्री. पवार म्हणाल्या की, केंद्राच्या  ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने शेतकरी व व्यापारी यांची होत असलेली अडचण सोडविण्यासाठी केंद्रीय पातळीवर चर्चा केली. त्यानुसार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी यावर विचार विनिमय करून हा निर्णय घेतला. त्यानुसार बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर पुढील तीन दिवस अवधी हाताळणी व प्रतवारी करण्यासाठी देण्यात आला आहे. 

याबाबतचे पत्र ग्राहक संरक्षण विभागाचे सीता राम मीना यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहे. त्यानुसार देशातील राज्य व संघ राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना देण्यात याव्या, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा कांदा लिलाव कामकाजात गती येईल असे बोलले जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com