यवतमाळ जिल्ह्यातील टाकळी (ता. उमरखेड) येथील अनिल जाधव यांनी पारंपरिक सोयाबीन, हरभरा पिकासोबतच रेशीम शेतीचा पूरक व्यवसाय जोपासला आहे. यातून मिळणाऱ्या हंगामी उत्पन्नाला जोड देण्यासाठी व दैनंदिन खर्चाची तजवीज होण्यासाठी दुग्धोत्पादन करतात. शेतीमध्ये खर्च कमी करण्यासाठी मजुराविना शेतीची संकल्पना राबवली आहे. मराठवाड्याच्या सीमेवरील टाकळी गावामध्ये एका बाजूला इसापूर धरणाचा डावा कालवा तर खालच्या बाजूला पैनगंगा नदी असे दोन पाण्याचे मुख्य स्रोत आहेत. परिणामी सिंचन सुविधा उत्तम असलेल्या या गावामध्ये व्यावसायिक शेती आणि त्यातून येणारी संपन्नता नांदते. येथील अनिल जाधव यांच्याकडे एकत्रित कुटुंबाची ११ एकर शेती आहे. पारंपरिक शेतीमध्ये जमिनीच्या मशागतीपासून काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर पैशांची गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर हंगाम सर्वार्थाने साधला तर त्याचा परतावा मिळतो. म्हणजे खर्च करत राहण्याचा कालावधी जास्त असतो, तर त्या तुलनेमध्ये उत्पन्न मिळत राहण्याचा कालावधी कमी असतो. खेळता पैसा फारसा राहत नाही. कौटुंबिक गरजांच्या पूर्ततेसाठी नियमित काही रक्कमेची आवश्यकता असते. त्यामुळे पूर्वी पारंपरिक पिकांवरच समाधानी असलेल्या कुटुंबाने दुग्धोत्पादनासह रेशीम शेतीसारखा वेगळा मार्ग स्वीकारला. नजीकच्या विडूळ गावातील सिद्धेश्वर व महेश्वर बिचेवार यांच्या मार्गदर्शनात तीन वर्षापूर्वी दीड एकरवर तुती लागवड करत रेशीमशेतीचा निर्णय घेतला. त्यात सातत्यही राखले. रोजच्या पैशाची केली सोय
अशी आहे चारा लागवड जनावरांच्या हिरव्या चाऱ्याची सोय करण्यासाठी यवतमाळ येथील कृषी विज्ञान केंद्रातून गजराज चाऱ्याच्या सुमारे ५०० कांडी प्रती काडी एक रुपये या प्रमाणे खरेदी केल्या. अर्धा एकरावर ही लागवड केली. नियमित कापणीद्वारे त्यातून सुमारे सात ते आठ वर्ष चाऱ्याची उपलब्धता होते. त्यांनी पाच वर्ष चाऱ्याचे उत्पादन घेतल्यानंतर आता नव्याने चारा लागवड केली आहे. सोबतच सोयाबीन, हरभरा कुटार ही चारा म्हणून दिले जाते. जनावरांकरिता मुक्त गोठा
मजुराविना शेतीचा पॅटर्न
आदर्श पशुपालक शेती आणि पशुसंवर्धन क्षेत्रात आदर्श निर्माण करणाऱ्या अनिल जाधव यांना विविध व्यासपीठावर गौरविण्यात आले. पशुसंवर्धन विभाग, यवतमाळ केव्हीके आणि कृषी विभाग यांच्याकडून त्यांचा आदर्श पशुपालक म्हणून गौरव केला आहे. रेशीम शेतीतही लौकिक
तांत्रिक मार्गदर्शन महत्त्वाचे... पूर्वी १०० अंडीपूंजातून केवळ ६० ते ६५ किलो कोष उत्पादन मिळे. अंडीपूंजातून अळी बाहेर येण्यादरम्यानच्या व्यवस्थापनात मरतुकीचे प्रमाण जास्त होते. तांत्रिक मार्गदर्शनातून यात सुधारणा केल्या. आता चॉकी म्हणजेच बाल्यावस्थेतील अळ्यांची थेट खरेदी करतो. परिणामी मरतुकीचे प्रमाण कमी करण्यात यश आले. आता १०० अंडीपूंजांपासून आता ८० ते ९० किलो कोष उत्पादन घेत असल्याचे अनिल यांनी सांगितले. आर्थिक ताळेबंद पूरक व्यवसायातून मिळणारे उत्पन्न - १) दुग्धव्यवसाय -
२) रेशीम शेतीचे अर्थशास्त्र
उर्वरित ८ एकर शेतीमध्ये सोयाबीन, हरभरा ही मुख्य पिके असतात. या पिकांचे अर्थशास्त्र खालील प्रमाणे -
वर्ष | पीक | उत्पादकता (प्रती एकर) | दर (रुपये प्रती क्विंटल) | खर्च (रुपये प्रती एकर) |
२०१७-१८ | सोयाबीन | ८ क्विंटल | ३५०० | ७००० |
२०१७-१८ | हरभरा | ८ क्विंटल | ३९०० | ६००० |
२०१८-१९ | सोयाबीन | ९ क्विंटल | ३७०० | ७००० |
२०१८-१९ | हरभरा | १० क्विंटल | ४००० | ६००० |
संपर्क - अनिल जाधव, ९४२१८९३२३८
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.