बीड : आंबिया बहराच्या मोसंबी फळांमध्ये साखर निर्मितीस सुरुवात होत असतांनाच फळांवर रस शोषण करणारे पतंग, फळमाशी आदींचा प्रादुर्भाव होतो. त्याच्या प्रभावी नियंत्रणासाठी सापळ्यांचा वापर फायदेशीर ठरतो, असे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.
रौळसगाव (ता. बीड) येथे शनिवारी (ता. १२) आयोजित प्रक्षेत्र भेटीदरम्यान ते बोलत होते. या दरम्यान त्यांच्यासमवेत मोसंबी बागायतदार सूर्यकांत हजारे, अविनाश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव लोढा आदींची उपस्थिती होती.
डॉ. पाटील म्हणाले की, फळातील रस शोषण करणारे पतंग निशाचर असल्याने सायंकाळी बाहेर पडून पिकलेल्या फळांच्या सालीत छिद्र करून रस शोषून घेतात. परिणामी फळात बुरशी वा जिवाणूंची वाढ होऊन फळे सडून गळतात. त्यासाठी बागेत धूर करावा. बाधित फळे नष्ट करून बाग स्वच्छ ठेवल्यास नक्कीच नुकसान कमी होते.
यासोबतच नर माशांना करण्यासाठी मिथिल उजेनॉल सापळ्यांचा वापर केल्यास फळमाशीच्या पुढील पिढीस अटकाव होण्यास मदत मिळते. वेळोवेळी कृषी विद्यापीठाकडून मार्गदर्शन मिळाल्यास शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होईल, असे अशोकराव लोढा यांनी सांगितले. या वेळी मोसंबी बागायतदारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डाॅ. पाटील यांनी सविस्तर उत्तरे दिली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.