वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी : सहकारमंत्री देशमुख

वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी : सहकारमंत्री देशमुख
वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी : सहकारमंत्री देशमुख

सोलापूर  : पर्यावरणाचा समतोल रहावा, वनाच्छादीत क्षेत्रात वाढ होऊन हरित महाराष्ट्र घडावा, यासाठी यावर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. लोकांनी स्वयंप्रेरणेने व उत्सफूर्तपणे त्यामध्ये सहभागी व्हावे. हे अभियान एक लोकचळवळ व्हावी, असे मत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.

राज्य शासनाने यंदा १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार केला आहे. यानिमित्ताने आज दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील माळकवठे येथे वन व सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवडीची सुरवात देशमुख यांच्या हस्ते झाली. या वेळी उपवनसंरक्षक संजय माळी, कृषी उपसंचालक रवींद्र माने, विभागीय वन अधिकारी सुवर्णा माने, माळकवठेचे सरपंच शिवलिंग बगले यांच्यासह ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी आणि वन व सामाजिक वनीकरणाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, "पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, वनांची घटती संख्या चिंतेची बाब आहे. यावर प्रभावी उपाय म्हणून राज्य शासनातर्फे राज्यात ५० कोटी वृक्षलागवड होणार आहे. यामध्ये मागीलवर्षी ४ कोटी वृक्षलागवड झाली. यंंदा १३ कोटी आणि पुढील वर्षी ३३ कोटी वृक्षलागवड होईल. लागवड केलेल्या वृक्षांचे जतन संगोपन करणे महत्त्वाचे आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या शेतात, बांधावर वृक्षलागवड करण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत ( एमआरईजीएस ) नवीन योजना आणली आहे. "

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com