‘एफआरपी’ १४ दिवसांत देण्याचा प्रयत्न

‘एफआरपी’ १४ दिवसांत देण्याचा प्रयत्न
‘एफआरपी’ १४ दिवसांत देण्याचा प्रयत्न

इस्लामपूर, जि. सांगली ः एफआरपी १४ दिवसांत देण्याचा प्रयत्न राहील, असा विश्‍वास व्यक्त करीत राज्यात अतिरिक्त साखरेचा मोठा प्रश्‍न असून, आपणाला कार्यक्षमता वाढवून त्याला सामोरे जावे लागणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी येथे केले.

राजारामबापू साखर कारखान्याच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या वेळी मोबाईल ॲपचे अनावरण झाले. पी. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, विजय पाटील, विष्णूपंत शिंदे, बी. के. पाटील, विनायकराव पाटील, शामराव पाटील, जगन्नाथ पाटील, भगवान पाटील, छाया पाटील, जनार्दन पाटील, सुहास पाटील, कामगार नेते शंकरराव भोसले आदी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, की साखरेला दर मिळणार हे गृहीत धरून बॅंकांनी कर्जे दिलीत. पण, २०० लाख टन साखर शिल्लक राहण्याची शक्‍यता आहे. जुनी आणि आताची मिळून साखर ५०० टनांवर जाईल. यावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांच्या पुढाकाराने प्रयत्न सुरू आहेत. नवीन ॲपमुळे ऊस नोंदी, स्लिपवाटप, मोजणी, तोडणी माहिती त्यावर होईल. कर्मचारी कामावर नियंत्रण ठेवता येईल.

तानाजीराव पाटील यांनी काही नकारात्मक मुद्दे मांडत असताना सभासदांत गोंधळ सुरू झाला. तो थांबवत जयंतरावांनी आपल्याकडे ही प्रथा नसल्याचे सांगून पाटील यांना बोलू दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com