तुबची-बबलेश्‍वरच्या पाण्यावरून रंगला श्रेयवाद

तुबची-बबलेश्‍वरच्या पाण्यावरून रंगला श्रेयवाद
तुबची-बबलेश्‍वरच्या पाण्यावरून रंगला श्रेयवाद

सांगली ः जत तालुक्‍याच्या पूर्व भागातील ४२ गावांना पाणी देण्यासाठी तुबची-बबलेश्‍वर पाणी योजनेतून देण्याचा विचार महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकार करत आहेत. मात्र,  मात्र, अद्यापही ही योजना कशात काही नसताना नेत्यांचा यावरून चांगलाच श्रेयवाद रंगला आहे. येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा घाट घातला असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे.

जत तालुक्‍याच्या पूर्व भागात भीषण पाणीटंचाई आहे. या भागात म्हैसाळ योजनेचे पाणी मिळत नाही. यामुळे पाणीटंचाई दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पाणीटंचाई कमी करण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकाने बैठक घेऊन कर्नाटकातून पाणी देण्याचा विचार केला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासाठी १० कोटींचा निधीही देण्याचे जाहीर केले. मात्र, हा निधी मिळाला का नाही हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. जत तालुक्‍याला पाणी देण्यासाठी सातत्याने बैठका घेतल्या जातात. मात्र, दोन्ही राज्यांतील मंत्री आणि अधिकाऱ्यांत याबाबत ठोस बैठक झालीच नाही. केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे.

दरम्यान, पाच वर्षांत कर्नाटक सरकाने ३७ गावांसाठी तीन हजार कोटी रुपये खर्चून तुबची-बबलेश्‍वर ही योजना पूर्ण केली. ही योजना पूर्ण झाल्यानंतर गेल्या महिन्यात याची चाचणीही घेतली. बंदिस्त वितरिकेतून तलावात पाणी भरून घेण्याचे काम कर्नाटक शासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. याठिकाणापासून जत सीमाभाग अगदी दोन किलोमीटरवर आहे. कर्नाटक शासनाने अथणी, विजापूर आणि इंडी तालुक्‍यातील शेवटच्या गावापर्यंतच्या शिवारात पाणी पोचवले. ही चाचणी यशस्वी झाली असल्याचे येथील स्थानिक नेते सांगतात. त्यामुळे या योजनेतून जत तालुक्‍याच्या पूर्व भागातील ४२ गावांना पाणी देण्यासाठी आता श्रेयवाद सुरू झाला आहे. केवळ श्रेयवाद नव्हे तर, एकमेकांवर टीकाही सुरू झाल्या आहेत. 

तुबची-बबलेश्‍वर योजना पूर्ण झाली, चाचणी झाली. यामुळे जत तालुक्‍यातील ४२ गावात या योजनेचे पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, सातत्याने राजकीय श्रेयवाद रंगला जात असल्याने पाणी कधी मिळणार असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

तीस हजार एकर ओलिताखाली तुबची-बबलेश्‍वर योजनेतून बाबानगर-कनमडी येथे पाणी आले आहे. नैसर्गिक उताराने हे पाणी भिवर्गी, तिकोंडी पांडोझरी, जालिहाळ बुद्रुक सिद्धनाथ, संख मध्यम प्रकल्प भरून घेता येणे शक्‍य आहे. यातून ३० हजार एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. पूर्व भागातील ४२ गावांचा पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मिटणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com