जवस पिकाकडे वळा : डॉ. झाडे

औरंगाबाद : एकरी लागवड खर्च ५ ते ६ हजार करून २५-३० हजार उत्पन्न जवसाच्या पिकातून मिळवता येते. एलएसएल-९३ हा वसंतराव नाईक मराठवाडा कृषीविद्यापीठ, परभणी यांनी विकसित केलेला अत्यंत चांगला वाण आहे.
Turn to linseed: Dr. Zaade
Turn to linseed: Dr. Zaade

औरंगाबाद : ‘‘एकरी लागवड खर्च ५ ते ६ हजार करून २५-३० हजार उत्पन्न जवसाच्या पिकातून मिळवता येते. एलएसएल-९३ हा वसंतराव नाईक मराठवाडा कृषीविद्यापीठ, परभणी यांनी विकसित केलेला अत्यंत चांगला वाण आहे. तो कमी दिवसांत (८३ दिवसांत) परिपक्व होतो. कमी पाण्यावर येऊन अधिक उत्पन्न येते. त्यामुळे या पिकाकडे अधिकाधिक शेतकऱ्यांनी वळावे’’, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे  कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे यांनी दिला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीअंतर्गत कृषीविज्ञान केंद्र, औरंगाबादतर्फे बुधवारी (ता. ३) करजगाव (जि. औरंगाबाद) येथे जवस शेती दिन कार्यक्रम झाला. विषय विशेषज्ञ डॉ. बस्वराज पिसुरे, अशोक निर्वळ, करमाडचे मंडळ कृषी अधिकारी, लक्ष्मण काळे, कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी इरफान शेख, शिवा काजळे, किशोर शेरे आदी उपस्थित होते. डॉ. झाडे म्हणाले, ‘‘जवसात ओमेगा ३ हा घटक आहे. तो आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे दररोजच्या आहारात शेतकऱ्यांनी जवसाचा उपयोग करावा.’’

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे म्हणाले, ‘‘जवस हे जुनेच पीक आहे. परंतु त्याची लागवड आता कमी होत आहे. जवस हे आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे. कमी पाण्यामध्ये व कमी खर्चामध्ये अधिक नफा मिळून देणारे हे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे नक्की वळावे. या बरोबर जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सोयाबीन पिकाकडे वळावे. जवस, सोयाबीन पिकांचे बियाणे सर्व शेतकऱ्यांनी शिल्लक ठेवावे. इतर शेतकऱ्यांपर्यंत या बियाण्यांचा प्रसार करावा.’’ 

निर्वळ म्हणाले, ‘‘बदलत्या हवामानाचा शेतीवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे या बदलत्या हवामानाशी निगडित राहून शेतकऱ्यांनी शेती करणे गरजेचे आहे. पिकांचे आपत्कालीन व सध्यस्थितीतील नियोजनाच्या माहितीसाठी जिल्हा कृषी हवामान केंद्र (DAMU) द्वारे कृषी हवामान सल्ला पत्रिका तयार करून प्रसारित करण्यात येतात. 

यात पुढील पाच दिवसांच्या हवामानाच्या अंदाजानुसार पीकनिहाय सल्ला शेतकऱ्यांना देण्यात येतो.’’ कृषी विद्यापीठाची कृषी दिनदर्शिका तसेच शेती निविष्ठांचे वाटप या वेळी करण्यात आले. 

शेतकऱ्यांनी जवस पिकाकडे वळून या पिकाचे उत्पादन वाढवावे. हे पीक कमी पाण्यात येणारे आहे. त्यामुळे हे पीक शेतकऱ्यांना फायदेशीर आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com