सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर डाऊनी 

बदलत्या हवामानाचा फटका द्राक्ष बागेला बसला आहे. हवामान कसे राहिल सांगता येत नाही. पण असेच हवामान राहिले तर द्राक्ष बागांवर डाऊनीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. - महादेव लाड, कुंडल.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस, त्यानंतर धुके, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे. या बदलत्या वातावरणामुळे २० टक्के द्राक्ष क्षेत्रावरील बागांवर डाऊनीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे शेतकऱ्यांनी सागितले आहे. असेच वातावरण राहिल्यास डाऊनीचा प्रादुर्भाव वाढून द्राक्ष बागेचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज शेतकऱ्यांतून व्यक्त होऊ लागला आहे.

जिल्ह्यात आजअखेर ५० टक्के फळ छाटणी झाली आहे. वास्तविक पाहता, ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाल्याने द्राक्षाची छाटणी लवकर घ्यावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खर्च करून बागा निरोगी ठेवण्यात यश आले होते. अनेक भागात द्राक्ष बागेत फुलोरा अवस्था आली आहे. तर काही ठिकाणी द्राक्षाचे घड बाहेर पडले आहेत. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला. शेतात पाणी साचून राहिले होते. त्यातच मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून वातावरणात बदल होऊ लागले आहे. धुकेही पडले होते. त्यामुळे पानांवर पाणी साचून राहिले.  परिणामी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. त्यातच दुष्काळी पट्ट्यात अद्यापही छाटणी झाली नाही. ज्या ठिकाणी छाटणी झाली आहे, त्याठिकाणी डाऊनीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. डाऊनी रोगाचे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणी करण्याचे नियोजन सुरू केले आहे. काही ठिकाणी फवारणीची संख्यादेखील वाढवली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com