भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी विकला दोन कोटीचा शेतमाल

भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात राज्यभरात फळे व भाजीपाल्याची थेट विक्री करून सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल केली केली आहे.
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी विकला दोन कोटीचा शेतमाल
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी विकला दोन कोटीचा शेतमाल

कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात राज्यभरात फळे व भाजीपाल्याची थेट विक्री करून सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल केली केली आहे. सोशल मीडियाचा वापर करून व संघाच्या शहरातील कार्यकर्त्यांच्या मदतीने भाजीपाला व फळांची विक्री संघाने सुरू ठेवली आहे. ग्राहक पंचायत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (ग्रामविकास विभाग) यांच्या सहकार्याने ‘इर्जिक’ या नावाने हा उपक्रम सुरू आहे.  राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर, नाशिक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे २९ तालुक्यातील शेतकऱ्यांनी संघाच्या मार्फत थेट भाजीपाला विकला आहे. या जिल्ह्यातील १६४ शेतकरी गटांच्या मार्फत भाजीपाला संकलीत करून तो शहरी भागात विकण्यात आला. या उपक्रमाचा या जिल्ह्यातील सुमारे पाचशे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. दीड लाखाहून अधिक ग्राहकांनी व्यापाऱ्यापेक्षा कमी दरात या शेतकऱ्यांकडून शेतमाल विकत घेत आहेत.  जनता कर्प्यू जाहीर झाल्यानंतर लगेच भारतीय किसान संघाने प्रांत कार्यकारिणीची बैठक घेतली व अगामी काळात शेतीमध्ये तात्काळ व दिर्घकाळ कोणत्या समस्या येतील याचा विचार करून सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सर्वेक्षणाच्या सुचना देण्यात आल्या. नाशवंत भाजीपाला, फळे यांचे मार्केटींग करणे हे अत्यंत तातडीचे होते हे लक्षात आले. विक्रीसाठी पुणे, सातारा, कोल्हापूर येथील हौसिंग सोसायटी, कॉलिनीज येथील ग्राहकांचे सर्वेक्षण केले. वॉट्सॲप ग्रुप बनवले, गुगल पेजद्वारे त्यांच्या प्रत्येक आठवड्याची भाजीपाला फळे यांची मागणी नोंदवून घेतली. या साठी शहरातील कार्यकर्त्यांनी काम केले.  आठ जिल्ह्यातील २९ तालुक्यांत १६४ गावात शेतकऱ्यांचे गट स्थापन करून हे काम ताबडतोब सुरु केले. सुमारे पाचशे शेतकरी या गटांच्या माध्यमातून शहरी भागातील ग्राहकांना फळे व भाजीपाला पुरवत आहेत.  भाजीपाला, फले विक्री  सहभागी जिल्हे - ८  सहभागी तालुके - २९  सहभागी गावे - १७४  शहरातील सोसायटी -१४९  कार्यकर्ते ५००  शेतकरी - ५०० हुन अधिक  ग्राहक - १७००००  शेतमाल विक्री - ५०० टनाहून अधिक  उलाढाल - २ कोटी  भाजीपाला, फळांचे लॉकडाउन सुरू झाल्यापासून हा उपक्रम सुरु आहे. शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला पुर्वीपेक्षा जादाभाव तर शहरी ग्राहकांना पुर्वीपेक्षा कमी भावात शेतमाल मिळत आहे. ग्राहक व शेतकरी कायमस्वरूपी ही योजना चालवण्यासाठी सिध्द झाले आहेत. ही संधी भारतीय किसान संघाने कोरोनाच्या संकटात शोधली आहे.  - मदन देशपांडे, भारतीय किसान संघ महामंत्री 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com