कडाक्याच्या थंडीत पीकविम्यासाठी दोन शेतकऱ्यांचे पुण्यात उपोषण

कृषी आयुक्तालयासमोर कडाक्याच्या थंडीत मराठवाड्यातील दोन शेतकरी उपोषणाला बसले आहेत. कृषी अधिकारी आणि विमा कंपनीने संगनमत करून विमा भरपाई मिळू न दिल्याची तक्रार या शेतकऱ्यांची आहे.
कडाक्याच्या थंडीत पीकविम्यासाठी दोन शेतकऱ्यांचे पुण्यात उपोषण Two farmers go on hunger strike in Pune for crop insurance in extreme cold
कडाक्याच्या थंडीत पीकविम्यासाठी दोन शेतकऱ्यांचे पुण्यात उपोषण Two farmers go on hunger strike in Pune for crop insurance in extreme cold

पुणे : कृषी आयुक्तालयासमोर कडाक्याच्या थंडीत मराठवाड्यातील दोन शेतकरी उपोषणाला बसले आहेत. कृषी अधिकारी आणि विमा कंपनीने संगनमत करून विमा भरपाई मिळू न दिल्याची तक्रार या शेतकऱ्यांची आहे. प्रवेशद्वारासमोर शेतकऱ्यांनी सोमवारपासून (ता. २१) उपोषण सुरू केले आहे. जालन्याच्या घनसांगवी भागातील भोगगाव येथील सुधीर रामनाथ मुळे व पुंजाराम दादाराव जाधव, अशी उपोषण करणाऱ्यांची नावे आहेत. २४ ऑक्टोबर २०१९ मध्ये गावात झालेल्या तुफान पावसामुळे गावातील शेतकऱ्यांच्या कपाशीचे पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले होते. दुसऱ्याच दिवशी ७२ तासांच्या आत या शेतकऱ्यांनी नुकसानीची लेखी खबर (इंटिमेशन) दिली होती. “आम्ही कळवून देखील भरपाई टाळण्यासाठी विमा कंपनी व कृषी खात्याने संगनमत करून पिकाचा पंचनामा करण्याचे टाळले. यामुळे आम्ही २१ ते २४ डिसेंबर, असे चार दिवस जालना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) कार्यालयासमोर उपोषण केल्यानंतर पंचनामा करण्याचे आश्वासन दिल होते,” अशी माहिती शेतकरी मुळे यांनी दिली. उपोषण सोडताना आमच्या शेताचा पंचनामा तीन महिन्यानंतर कसा करणार, असा सवाल आम्ही उपस्थित केला होता. त्यावर, काळजी करू नका आपण अवशेषाचा पंचनामा करू, असा तोडगा अधिकाऱ्यांनी काढला. मात्र, २६ ऑक्टोबरला कृषी कर्मचारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधीने गावात जावून कोऱ्या अहवालावर स्वाक्षऱ्या घेतल्या, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे.  “आम्हाला पंचनाम्याची प्रत द्या, अशी मागणी करूनही कृषी खाते देत नव्हते. त्यासाठी मी आठ वेळा माझ्या गावाहून ९० किलोमीटर एसएओ ऑफिसला प्रवास केला. त्यानंतर मला प्रत मिळाली असता, शेतात कापूस नसल्याची नोंद त्यात केली होती. आम्ही थेट विभागीय महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी हे प्रकरण कृषी खात्याला कळविले. मात्र, दखल घेतली गेली नाही,” अशी कैफियत मुळे यांनी मांडली. शेतकऱ्यांची मागणीच चुकीची “पीक विमा योजनेतील नियमानुसार या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येत नाही. वैयक्तिकपणे भरपाईची मागणी करता येत नाही. नियमाविरूद्ध मागणी असल्यामुळेच या शेतकऱ्यांची दखल घेतली गेलेली नाही,” अशी माहिती आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com