पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र उभारा : उध्दव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे

मुंबई : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना पीकविम्याचा परतावा मिळालेला नाही. मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून देण्यासाठी केंद्र उभारले. याच धर्तीवर जेथे मदत मिळाली नाही अशा ठिकाणी मदत केंद्र उभारून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. 

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख यांची शुक्रवारी (ता. १४) बैठक घेतली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. गेली साडेचार वर्षे आपण भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध केला. आता लोकसभा निवडणुकीत आपण त्यांच्याशी युती केली. विधानसभा निवडणुकीत ही युती कायम असणार आहे. विरोधकांकडून युतीबाबत अपप्रचार सुरू असून, त्याकडे लक्ष देऊ नका. युती म्हणून विधानसभेला आपल्याला एकत्र लढायचे आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही आपल्याला विजय मिळवायचा आहे, असे श्री. ठाकरे म्हणाले.

पीकविमा काढूनही भरपाई मिळाली नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. मराठवाड्यातील आपल्या जिल्हाप्रमुखांनी शेतकरी आणि संबंधित विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना एकत्र बोलावून मदत मिळवून देण्याचा उपक्रम राबवला. या उपक्रमात सहभागी झालेल्या साडेअकरा हजार शेतकऱ्यांपैकी साडेआठ हजार शेतकऱ्यांना पीक विमा परतावा मिळाला. त्यामुळे राज्यभरात असे उपक्रम राबवा आणि पीकविम्याची रक्कम का मिळाली नाही? याचा जाब संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारा, असा आदेश श्री. ठाकरे यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com