निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते ः उदयनराजे भोसले

निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते ः उदयनराजे भोसले
निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते ः उदयनराजे भोसले

सातारा  ः देशात नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लाट होती. शेतकरी प्रश्नांसह बेरोजगारी, आर्थिक उन्नती असे  अनेक प्रश्‍न अनुत्तरीत असतानाही भाजपला बहुमत मिळाले आहे ही न पटणारी गोष्ट आहे. ईव्हीएम मशिनद्वारे सत्ता प्रस्थापित करण्यापेक्षा निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते, असे मत खासदार उदयनराजे भाेसले यांनी व्यक्त केले.

सातारा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर शुक्रवारी (ता. २४) खासदार उदयनराजे भाेसले यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळास अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, की अकरा राज्यांमध्ये काॅँग्रेसला एकही जागा मिळत नाही आणि त्यांची पीछेहाट होते ही बाब न पटणारी आहे. ही निवडणूक प्रक्रिया शंकास्पद आहे. परदेशात बॅलेट पेपरचा वापर केला जाताे. परंतु, आपल्याकडे विराेध असतानाही मतदान यंत्राचा (ईव्हीएम) वापर केला जाताे. ईव्हीएम मशिनद्वारे सत्ता प्रस्थापित करण्यापेक्षा निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते.

दरम्यान, ज्यांनी मला मतदान केले आणि केले नाही या सर्वांचे मी काम करणार आहे. मी कोणत्याही प्रकारचा दुजाभाव करीत नाही आणि यापूर्वी ही केलेला नाही. भविष्यकाळात ही करणार नाही. लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन, असे त्यांनी नमूद केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com