‘उजनी‘च्या पाण्यासाठी बार्शीत शेतकऱ्यांचा मोर्चा

‘उजनी‘च्या पाण्यासाठी बार्शीत शेतकऱ्यांचा मोर्चा
‘उजनी‘च्या पाण्यासाठी बार्शीत शेतकऱ्यांचा मोर्चा

सोलापूर : उजनीचे पाणी ढाळेपिंपळगाव मध्यम प्रकल्पात सोडण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेने सोमवारी (ता. २६) तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात बावी, पिंपळगाव, मळेगाव, महागाव, खामगाव, साकत, पानगाव, कळंबवाडी, चिखर्डे, तांदूळवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी भाग घेतला. 

भगवंत मैदानातून तहसील कार्यालय येथे ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. या वेळी ठोंबरे म्हणाले, ‘‘पाण्यासाठी किसान सभेने फार वर्षांपासून सुरू केलेला हा लढा आहे. शेतकरी लढ्याने अमर शेख यांनी बार्शी गाजवली. त्याच बार्शी तालुक्यातील शेतकरी पाण्यासाठी रान उठवतील. आता राजकारणाची नाही, तर शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मागणीचीच फक्त चर्चा होईल.’’

‘‘उजनीचे पाणी ढाळे पिंपळगाव प्रकल्पात पोचवणे हेच धेय किसान सभेपुढे आहे. उद्ध्वस्त शेतकरी ती मागणी पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाईल, मागणी मान्य न झाल्यास उद्या (ता. २९) रास्ता रोको करण्यात येईल, असा इशाराही ठोंबरे यांनी दिला.

या वेळी तालुकाध्यक्ष लक्ष्मण घाडगे, उपाध्यक्ष लहू आगलावे यांच्यासह शेतकऱ्यांनीही पाणी सोडण्याची मागणी केली. पाणी नसल्याने शेतकऱ्यांच्या झालेल्या अवस्थेस शासनास जबाबदार धरले. आंदोलनात ए. बी. कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी सहभागी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com