‘विकेल ते पिकेल’अंतर्गत साताऱ्यात रयत बाजार सुरू
सातारा : ‘‘‘विकेल ते पिकेल’ हे अभियान राज्यात राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव, बाजार पेठ, ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होईल. याचा लाभ शेतकऱ्यांबरोबर ग्राहकांना होणार आहे,’’ असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील केले.
‘विकेल ते पिकेल’ या धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाचा प्रारंभ मंगळवारी (ता.२६) पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते अण्णासाहेब कल्याणी शाळे समोरील मैदानात करण्यात आला. जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजकुमार बन्सल, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अशोक देसाई उपस्थित होते.
‘‘या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी कृषी व संलग्न विभागांच्या तसेच सहकार, पणन, नाबार्ड इत्यादी विभागांच्या विविध योजनांची सांगड घालण्यात येईल. विविध योजनांतर्गत शेतकरी गटांना त्यांच्या शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी सुविधा पुरविण्यात येतील. लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांनी माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवून दिलासादायक काम केले. नवीन पिढी शेतात विविध प्रयोग करीत आहे. त्यांच्या मालाला चांगला भाव व बाजार पेठ मिळावी, यासाठी या अभियानाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती होईल’’, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.