‘कोरोना’च्या सावटातही पैसे काढण्यासाठी बँकांसमोर रांगा

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत म्हणून केंद्र सरकारकडून पंतप्रधान जनधन योजनेच्या महिला खातेधारकांच्या खात्यात प्रत्येकी पाचशे रुपये रक्कम जमा करण्यात येत आहे. हे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये सर्वत्र गर्दी उसळली आहे.
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत म्हणून केंद्र सरकारकडून पंतप्रधान जनधन योजनेच्या महिला खातेधारकांच्या खात्यात प्रत्येकी पाचशे रुपये रक्कम जमा करण्यात येत आहे. हे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये सर्वत्र गर्दी उसळली आहे.
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत म्हणून केंद्र सरकारकडून पंतप्रधान जनधन योजनेच्या महिला खातेधारकांच्या खात्यात प्रत्येकी पाचशे रुपये रक्कम जमा करण्यात येत आहे. हे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये सर्वत्र गर्दी उसळली आहे.

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत म्हणून केंद्र सरकारकडून पंतप्रधान जनधन योजनेच्या महिला खातेधारकांच्या खात्यात प्रत्येकी पाचशे रुपये रक्कम जमा करण्यात येत आहे. हे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये सर्वत्र गर्दी उसळली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे एप्रिल, मे व जून महिन्यात जनधन योजनेचे खाते असलेल्या महिलांच्या खात्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येकी पाचशे रुपये जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार बँक खात्याचा शेवटचा अंक ०,१,२,३ असलेल्या खात्यांतून ४ एप्रिल रोजी पैसे काढता येतील. बँक खात्याच्या शेवटचा अंक ४ व ५ असलेल्या खात्यात ७ एप्रिल रोजी, शेवटी ६ व ७ अंक असलेल्या बँक खात्यात ८ एप्रिल रोजी आणि ज्या बँक खात्याच्या शेवटी ८ व ९ अंक आहेत, अशा बँक खात्यात ९ एप्रिल रोजी पैसे जमा होणार आहेत. पैसे जमा झालेल्या दिवशी अथवा ९ एप्रिलनंतर केव्हाही खातेधारकाला हे पैसे काढत येतील. त्यामुळे खातेधारकांनी एकाच दिवशी बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.

बँक खात्याच्या शेवटच्या अंकानुसार तयार करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा होणार असून नागरिकांनी एकाच दिवशी बँकेमध्ये गर्दी करू नये. तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या खातेधारकांनी खात्यातील रक्कम काढण्यासाठी टपाल विभागाच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सातत्याने केले जात आहे.

वाशीमला टपाल कार्यालयात पैसे काढण्याची सुविधा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेल्या खातेधारकाला आपल्या खात्यातून १० हजार रुपये रक्कम काढण्याची सुविधा टपाल विभागाने कार्यालयात उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेल्या, जनधन खाते असलेल्या महिला तसेच इतर नागरिक सुद्धा आपल्या गावातील अथवा नजीकच्या गावातील टपाल कार्यालयात जाऊन आपल्या बँक खात्यातील रक्कम काढू शकतात.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील पैसे काढण्याचे वेळापत्रक बँक खात्याचा शेवटचा अंक पैसे काढण्याची तारीख ५, ७ एप्रिल २०२० ६ व ७, ८ एप्रिल २०२० ८ व ९, ९ एप्रिल २०२० या तारखांना पैसे न काढल्यास ९ एप्रिलनंतर केव्हाही बँक खात्यातून पैसे काढता येतील. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com